धर्मवीर संभाजीराजाला जीवंतपणी आणि मृत्यूनंतरही का छळलं ?
दत्तकुमार खंडागळे
छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते ! असं विधान अजित पवार यांनी केले आहे. या विधानावरून वादंग माजवले जात आहे. वास्तविक यात काही चुकीचे किंवा अवास्तव नाही. तरीही भाजपाच्या पदरी असलेल्या काही माध्यमांनी, तथाकथित विचारवंतांनी व चोंग्यांनी यावर वादंग माजवले आहे. खरेतर जे होतं ते ब-यासाठीच होतं. ज्या ज्या वेळी असे वादंग माजले जाते, त्या त्या वेळी भाजपाच्या असली चेह-याची व त्यांच्याच मेंदूच्या पुर्वजांनी केलेल्या हरामखो-यांची चर्चा सार्वजनिक होते. त्यांची ऐतिहासिक हरामखोरी लोकांच्यासमोर येते. या ही प्रकरणात तेच होणार आहे. संभाजी राजांना त्यांच्या हयातीत अण्णाजी दत्तो आणि त्यांच्यासोबत असणा-या शेंडी गँगने खुप छळलं. त्यांच्याविरोधात खुप कट-कारस्थानं केली. स्वराज्याचा इतिहास काढला, तो तटस्थपणे अभ्यासला तर छत्रपती शिवरायांना व संभाजीराजांनी इतर कुणी जेवढा त्रास दिला नाही तेवढा त्रास तत्कालीन कर्मठ व जातीयवादी ब्राम्हणांनी दिला हे सत्य कुणालाही नाकारता येत नाही. शिवाजीराजांचा मृत्युही वादग्रस्त आहे. गुडघीच्या रोगाने त्यांचा मृत्यू झाल्याची थाप या हरामखोरांनी इतिहासात लिहून ठेवली. राजांचा मृत्यू १६८० साली झाला. आज या घटणेला ३४३ वर्षे झाली. सुमारे साडेतीनशे वर्षे राजांच्या मृत्यूला झाली. इतक्या वर्षात म्हणजे गेल्या साडे तिनशे वर्षात गुडघीच्या रोगाने आजवर एकही माणूस मेलेला नाही. राजांच्या मृत्यूपुर्वी हजारो वर्षातही कुणी गुडघीच्या रोगाने मेल्याचे ऐकीवात किंवा वाचनात आले नाही. मग एकट्या शिवाजीराजांचाच मृत्यू गुडघीच्या रोगाने कसा झाला ? त्यांच्या मृत्यूनंतर लगोलग संभाजीराजांच्या अटकेचे फर्मान कसे निघाले ? अटक करायला अण्णाजी दत्तो व शेंडी गँगच का गेली ? हे वादाचे विषय आहेत. शिवरायांना राज्याभिषेक करताना विरोध कुणी केला ? अफझलखानासाठी वाईला कोटीचंडी यद्न कुणी केला ? राजांनी शाक्तपध्दतीने राज्याभिषेक का केला ? अफझलखान हिंदू मंदिरे पाडत होता, स्वराज्यावर चालून येत होता, देव बाटवत होता तर मग त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कसा काय ? आणि तोच भडवा शिवरायांच्या डोक्यात तलवारीचा वार कसा काय करतो ? अफझलखान मुस्लिम होता, शिवाजी राजे हिंदूंचे राजे होते. त्यांनी हिंदूंचे राज्य स्थापन केले होते तर मग हिंदू असणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफझलखानाच्या डोक्यात तलवार का मारत नाही ? शिवरायांच्याच डोक्यात तलवार का मारतो ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडतात. याची उत्तर इतिहास अभ्यासक देवेंद्र फडणवीस देतील का ?
छत्रपती संभाजीराजे धर्मवीर होते तर अण्णाजी दत्तो आणि त्याची शेंडी गँग संभाजीराजांना का छळत होती ? त्यांच्यावर विषाचे प्रयोग का करत होती ? औरंगजेबाचा मुलगा त्यांच्या विषप्रयोगाच्या कटात सामिल होत नाही पण हे स्वराज्यातील धर्मरक्षी असलेले, ब्राम्हणदेवता असलेले, धर्माचे ठेकेदार असलेले अण्णाजीपंत व त्याची गँग या उचापती का करत होती ? त्यांना या धर्मवीराला ताकद द्यावी, त्याच्यासाठी जीवाचे रान करावे ? असे का वाटले नाही ? संभाजीराजांनी या गद्दारांना हत्तीच्या पायी देवून मारले इतका छळ या लोकांनी संभाजी राजांचा केला. संभाजी राजे धर्मवीर होते तर असं का ? धर्माचे ठेकेदारच त्यांच्या विरोधात का होते ? संभाजीराजांना औरंग्याने हालहाल करून मारले. तो शत्रूच होता पण या कटात कोण कोण सामिल होते त्यांचे चेहरे इतिहासात दडपले गेले. ते समोर आणले नाहीत. संभाजीराजाच्या जीवंतपणी त्यांचा छळ केलाच पण त्यांच्या हत्येनंतरही त्यांचा छळ केला गेला. या छळाने आज तागायत त्यांची पाठ सोडली नाही. अनेक पुस्तकात, नाटकात, चित्रपटात संभाजीराजे बदफैली दाखवले, व्यसनी व रंगेल दाखवले. अनेक पुस्तकं लिहीणारा विद्वान, संस्कृतपंडीत, कवीमनाचा, पराक्रमी, शुरवीर संभाजीराजा आमच्यासमोर मांडताना तोडून-मोडून मांडला, विकृत करून मांडला. औरंग्याने त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे केले तसे या भडव्यांनी संभाजीराजांच्या चरित्राचे तुकडे तुकडे केले. कुत्र्यांनी जसे लचके तोडावेत तसे लचके स्वराज्यरक्षक संभाजीरांच्या चरित्राचे या लेखकांनी, नाटककारांनी तोडले. अनेक नाटकात, चित्रपटात संभाजीराजांच्या चारित्र्याची चामडी सोलली, पराक्रमाची नखे काढली, विद्वतेचे डोळे काढले. हे काम करणारे मुसलमान नव्हते किंवा औरंग्याच्या दरबारातले नव्हते. हे गद्दार, जातीयवादी लेखक मराठी मुलखातलेच होते. ज्यांच्याकडे धर्माची ठेकेदारी होती तेच होते. एका धर्मवीराची परवड या धर्माच्या ठेकेदारांनी का केली ?
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर देवेद्र फडणवीसांनी लगेच संभाजीराजे धर्मवीरच होते असं सांगत अजित पवारांचा निषेध केला आहे. संभाजी राजे धर्मवीर होते तर या धर्मवीराला जीवंतपणी आणि मृत्यूनंतरही का छळले ? याचे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी जरूर द्यावे. त्यांनी व त्यांच्या पाळीव चेले-चपाट्यांनी जरूर अजित पवारांचा निषेध करावा पण त्या आधी या सर्व प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राला द्यावीत. ज्या सावरकरांसाठी देवेंद्र फडणवीस घसा फाटेपर्यंत ओरडतात त्याच सावरकरांनी छत्रपती संभाजीराजांच्याबद्दल आणि शिवरायांच्याबद्दल काय म्हंटले आहे ते पहावे ? संभाजीराजांच्याबद्दल चुकीचे लिहीणा-या सावरकरांसह तमाम जातभाईंचा निषेध देवेंद्र फडणवीसांनी करावा. असा निषेध त्यांनी आजवर कधीही केलेला नाही. ज्या राज्यपालाने शिवरायांचा अपमान केला, महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला त्या राज्यपालाला पाठीशी घालणा-या, शिवरायांनी माफी मागितली असे वक्तव्य करणा-या भाजपाच्या सुधांशू त्रिवेदीला पाठीशी घालणा-या, शिवरायांचा अवमान करणा-या छिंदमला पाठीशी घालणा-या फडणवीसांना व त्यांच्या चेले-चपाट्यांना हा अधिकार तरी आहे काय ? लोकांना मुर्ख बनवण्याचे धंदे भाजपवाल्यांनी आता आवरावेत. लोक शहाणे होत आहेत. अजून पाच-दहा वर्षे लोकांना मुर्खात काढाल पण पाच-दहा वर्षांनी हेच लोक रस्त्यावर ओढून मारतील याचे भान ठेवा. सत्ता हातात आहे तर ती लोक कल्याणासाठी वापरा. दमन व दडपशाहीसाठी न वापरता लोकांच्या, राज्याच्या हितासाठी वापरा. जातीयवादी अजेंडे आता गुंडाळून ठेवा. हजारो वर्षे तुम्हीच इथले देव आणि राजे आहात. तुमच्याच मुठीत आणि मिठीत सर्व सत्ता राहिल्या आहेत. आता हा विकृत दृष्टीकोन बाजूला ठेवून काम करा. चांगल्या कामाच्या माध्यमातून पाच-दहाच काय हजार वर्षे राज्य करा आम्हाला हरकत नाही. फक्त जातीयवादाच्या विषाणूने बरबटलेले नासके मेंदू स्वच्छ करा. त्या स्वच्छ मेंदूने स्वच्छ सुखनैव राज्य करा. मुख्यमंत्री व्हा, प्रधानमंत्री व्हा आम्हाला अडचण नाही. पण जातीयवादी अजेंडे आतातरी गुंडाळून ठेवा.