शेतरस्त्यांना मिळाला मोकळा श्वास: राजवड येथील २ रस्ते अतिक्रमणमुक्त, ५० हेक्टर क्षेत्र मुख्य रस्त्यांशी जोडले
अमळनेर : विक्की जाधव
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 143 नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक रस्ते वापरण्याचा मूलभूत हक्क आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजवड (ता. पारोळा) येथील शेतकऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत अखेर दोन शेतरस्त्यांवरील अतिक्रमण स्वतःहून हटवून त्यांचा मोकळा मार्ग केला.
या उपक्रमासाठी कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेतला. एकूण ७ शेतरस्त्यांपैकी दोन रस्त्यांसाठी २० गटधारक शेतकऱ्यांनी एकत्र येत रु. ६० ते ६५ हजारांची लोकवर्गणी जमा करून सुमारे १.५ किमी लांबीचे रस्ते स्वखर्चाने तयार केले. यामुळे ३५ हून अधिक शेतकऱ्यांचे ५० हेक्टरहून अधिक क्षेत्र मुख्य रस्त्यांशी जोडले गेले आहे.
यामध्ये म. शासनाच्या दिनांक ४ नोव्हेंबर १९८७, २० मे २०२५ व २२ मे २०२५ च्या निर्णयांनुसार अंमलबजावणी झाली असून, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थ यांचा संयुक्त सहभाग लाभला. तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी पथकासह स्थळ पाहणी करत उर्वरित पाच रस्त्यांच्या अतिक्रमणमुक्तीसाठी लवकरच कार्यवाही करण्याचे संकेत दिले.
या प्रेरणादायी उपक्रमात सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सहाय्यक महसूल अधिकारी महेश जाधव, मंडळ अधिकारी निंबाळकर, तलाठी राकेश काळे यांचा देखील कृषिभूषण साहेबराव पाटील आणि ग्रामस्थांच्या वतीने सिंदूर लावून सत्कार करण्यात आला. यावेळी हरी बापू, पप्पू सूर्यवंशी, पिंटू मास्तर, सुभाष काका, श्रीमती मैराळे ताई, यशवंत पाटील, नरेंद्र (छोटू) पाटील, हादिश खाटीक, संभाजी पाटील, सुकलाल जिभू, वसंत बापू, अशोक नाना, गोकुळ पा., नितीन पा., सचिन पा., प्रमोद पा., सुरेश पाटील, किरण व नागेश परदेशी, अरुण (पिंटू) पाटील व उपस्थित होते.