महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या निरा नरसिंहपुर हे बनले दारू आणि जुगार याचा अड्डा.
निरा नरसिंहपुर;
दिनांक :०१/१२/२०२२
प्रतिनिधी: समाधान रजपूत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या निरा नरसिंहपुर गाव हे दारू, जुगार व मटक्याचा अड्डा झाले आहे.
देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी निरा नरसिंहपुर गावाच्या विकासासाठी 282 कोटीचा निधी दिलेला होता त्याच्या मधून वेगवेगळ्या प्रकारचे विकास कामे करण्यात आली आहेत व काही कामे प्रगतीपथावर आहेत. गावामध्ये कर्नाटक,मध्य प्रदेश तसेच इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठी आहे. या गावांमध्ये दारू, मटका व जुगाराचे प्रमाण हे खूप असल्यामुळे येणारे भाविक यांना याचा खूप त्रास होत आहे त्याचप्रमाणे येथे प्रार्थमिक शाळा व महा दोन महाविद्यालय आहेत यांनाही या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे. दारुडे लोक हे दारू पिऊन चौका चौकामध्ये आरडाओरडा तसेच शिवीगाळी करतात त्याच्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या लहान लहान मुलांना व पालकांना यांनी उच्चारलेले अपशब्द नाविलाजाने ऐकावे लागतात. पंचक्रोशीतील इतर गावातले लोक हे दारू पिण्यासाठी, मटका खेळण्यासाठी व जुगार खेळण्यासाठी येतात आणि लोकांना, महिलावर्गांना त्रास देतात .गावातील काही लोकांना याची कल्पना दिली तरी देखील कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणातील महिलावर्ग व ग्रामस्थ हे लवकरच आंदोलन करणार असल्याची चर्चा गावामध्ये चालू आहे. हे अवैध धंदे बंद करण्यासाठी भरपूर नागरिक उत्सुक आहेत परंतु या अवैध धंदेवाल्यांना राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे कोणालाही घाबरत नाहीत. नरसिंहपुर मधील ग्रामस्थांची अशी मागणी आहे की या विषयासाठी प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लक्ष घालून या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन येतील ग्रामस्थांचा प्रश्न सोडवावा. या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत तरी देखील हे धंदे राजरोजपणे आणि खुलेआम चालू आहेत अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून उमटत आहे.
नरसिंह पूर परिसरातील अवैध धंदे त्वरित बंद व्हावे अशी निरा नरसिंहपुर मधील ग्रामस्थांची मागणी आहे आणि ही मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री हे लवकरच पूर्ण करतील अशी लोकांची आशा आहे.