June 30, 2025 1:16 am

भारतानं जागतिक भूक निर्देशांक अहवाल २०२२ फेटाळला

अपनी भाषा में पढ़े! Translate

भारतानं जागतिक भूक निर्देशांक अहवाल २०२२ फेटाळला

भारतानं जागतिक भूक निर्देशांक अहवाल २०२२ फेटाळला आहे. या अहवालात भारताचं स्थान १२१ देशांमधे १०७ व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक चुकीच्या मोजपट्ट्यावर आधारित असून, पद्धतीशास्त्राच्या गंभीर त्रुटी त्यात असल्याचं केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.

भारत आपल्या जनतेच्या अन्न सुरक्षा आणि पोषण विषयक गरजांची पूर्तता करत नसल्याचं दाखवून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरु आहे. हेच पुन्हा एकदा दिसून आलंय, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. हा अहवाल वास्तवापासून दूर गेलेल्या तर आहेच पण विषेशत: कोविड काळात अन्न सुरक्षेसाठी सरकानं केलेल्या प्रयत्नांकडे जाणून बूजून डोळेझाक करणारा आहे, अशी टीकाही मंत्रालयानं केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!