भारतानं जागतिक भूक निर्देशांक अहवाल २०२२ फेटाळला
भारतानं जागतिक भूक निर्देशांक अहवाल २०२२ फेटाळला आहे. या अहवालात भारताचं स्थान १२१ देशांमधे १०७ व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक चुकीच्या मोजपट्ट्यावर आधारित असून, पद्धतीशास्त्राच्या गंभीर त्रुटी त्यात असल्याचं केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे.
भारत आपल्या जनतेच्या अन्न सुरक्षा आणि पोषण विषयक गरजांची पूर्तता करत नसल्याचं दाखवून भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरु आहे. हेच पुन्हा एकदा दिसून आलंय, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. हा अहवाल वास्तवापासून दूर गेलेल्या तर आहेच पण विषेशत: कोविड काळात अन्न सुरक्षेसाठी सरकानं केलेल्या प्रयत्नांकडे जाणून बूजून डोळेझाक करणारा आहे, अशी टीकाही मंत्रालयानं केली आहे.