नाशिक येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात,अनेक प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू !
प्रतिनिधी-एकनाथ भामरे
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे भीषण अपघातात झाला. या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास सात ते आठ प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या भीषण अपघातात अनेक प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या अत्यंत दुर्दैवी अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली !