ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; पैशाचे पॉकेट केले परत..
तांदुळवाडी /प्रतिनिधी
अजिनाथ कनिचे
(प्रामाणिकपणा हा रक्तातच असावा लागतो,याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे तांदुळवाडी गावचे ग्रामपंचायत कर्मचारी अतुल परबत)
माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथील तुकाराम अशोक गवळी हे गावातून रात्री उशिरा मोटारसायकल वरुन अंजनगाव रोडने घरी जात असताना पाऊस पडल्याने रानात जाणाऱ्या रस्त्यावरती ओड्याला पाणी आल्यामुळे कपडे काढून ओढा पार करुन गेले. परंतु नंतर कपडे फडकवून अंगावर घातल्यानंतर त्यांच्या खिशातील पैशाचे पॉकेट रस्त्यावर पडले हे त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु सकाळी 5:40 ला ग्रामपंचायत शिपाई अतुल परबत हे तांदुळवाडी गावामध्ये पिण्याचे पाणी सोडण्याकरीता गेले असता त्यांना हे पॉकेट आढळून आले. त्यांनी हे पॉकेट बघितल्यानंतर प्रामाणिकपणा दाखवून सापडलेले पॉकेट सकाळी तुकाराम गवळी यांना देण्यात आले. पॉकेट मध्ये रोख रक्कम 22 हजार रुपये व आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असल्याने तुकाराम गवळी, शांतीलाल गवळी, धनाजी गवळी, गणेश परबत, अभिजीत गवळी, प्रदीप कुंभार, भैय्या सोनवणे, पप्पू लंकेश्वर, राहुल भोई, बाळासाहेब कदम, नागनाथ गायकवाड, महेश गवळी, संतोष कदम, पृथ्वीराज गवळी, अक्षय गवळी, सुजित भोसले, भैय्या खबाले यांनी ग्रामपंचायत शिपाई अतुल परबत यांनी प्रामाणिकपणा दाखवल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. अतुलचे प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
