स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळांनी काढली जनजागृती रॅली
प्रतिनिधी:- प्रा.तुषार वाबळे
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. – त्यानिमीत्ताने संपूर्ण देशभरात हा स्वातंत्र्य दिवस “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्याचे योजिले आहे.या महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून “हर घर तिरंगा” या उपक्रमाअंतर्गत शेटफळगडे येथील जिल्हा परिषद शाळा वाबळे वस्ती आणि श्री नागेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांनी शेटफळे गाव आणि वस्ती परिसरात प्रभातफेरी काढून जनजागृती केली.

प्रभातफेरीवेळी विद्यार्थ्यांनकडून देशभक्ती पर घोषणा देत या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्ताने प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं अशा शूरवीर क्रांतिकारकांचे फोटो हातामध्ये घेऊन मोठ्याने घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढली. त्यातील काही विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारत महान पुरुषांची आठवण करून दिली. यावेळी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रभात फेरी संपन्न केली.
नागेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेली जनजागृती फेरी ही संपूर्ण गावातून काढली होती . यावेळी विद्यालयाचे पि.टी शिक्षक वाघमारे सर यांनी एनसीसी आरएसपी आणि स्काऊट गाईड या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने रॅलीच्या सुरुवातीलाच ढोल ताशांच्या गजरात तिरंगा हातात धरत एक वेगळेपणाची आठवण करून दिली. यावेळी विद्यालयातील इतरही विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक शूरवीरांचे स्मरण करून दिले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री भिसे सर आणि सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
