काय तो रस्ता, काय तो चिखल, काय ती गावातील वैतागलेली लोकं, सगळं कसं ओके… मदनवाडी रस्त्याची दुरवस्था
(निलेश गायकवाड )
इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावातील मेन रस्त्याची (आनंद हॉटेल ते गणपती मंदिर ) दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागणार असा सवाल उपस्थित केला जात असून याकडे संबधीत व्यक्तींचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत .
रस्ते विकासाचे प्रतीक आहे.रस्त्यांवरूनच विकासाची संकल्पना ठरविली जाते. एकीकडे स्मार्ट सिटी बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणार्या देशात ग्रामीण भागात नागरिकांना जायला धड रस्ता नाही. नागरिकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागतात. रस्त्याचे तीन-तेरा वाजल्याने नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे विकासाला खीळ बसत आहे.
रस्त्यासाठी 367 लाख मदनवाडी-पोंधवडी-निमसाखर त्यापैकी मदनवाडी हद्दीत असणारा आनंद हॉटेल ते गणपती मंदिर पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.खासदार सुप्रिया सुळे यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन होऊन सदर कामाबाबत दिरंगाई होत असल्याने ग्रामपंचायत येथे मिटिंग होऊन देखील काम मात्र कोणसीला व कागदीपत्रौ यावरतीच.त्यामुळे असं म्हणावं लागेल काय तो रस्ता, काय तो चिखल, काय ती गावातील वैतागलेली लोकं, आणि काय ती पुढारी सगळं कसं ओके…
सदर कामाबद्दल होत असलेली दिरंगाई म्हणजे गावाच्या विकासाबाबत पुढारी किती जागरूक आहेत असे म्हणावे लागेल…
