देशात कायदा शिल्लक असेल तर हिंदुस्थानात खरी लोकशाही !
निवडणुक चिन्ह कोणाचे ? बाण कोणाचा ?? हा प्रश्न बर्याच जनांना पडला आहे.जर या देशात कायदा शिल्लक असेल खरी लोकशाही जिवंत असेल सुप्रीम कोर्ट कोणाच्या दबावात चालत नसेल तर निवडणूक चिन्ह हे उद्धवसाहेबांचच राहिल आणि जर का या देशात कायदाच जिवंत नसेल सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारच्या हाताखालच बाहूला झाला असेल तर आपल बाण गद्दार गटांकडे जायला वेळ लागणार नाही हा निकाल आम्ही आजच जनतेसमोर मांडत आहोत.
सध्याची परीस्थिती पाहता खालपासून वर पर्यंत सगळी सरकारी यंत्रणा भाजपने हायजॅक केली आहे.तु आमच्या पक्षात ये नाहीतर तुला आम्ही इडी लावतो असा दम देऊन आमदार खासदार फोडले जात आहेत.स्वत:ची प्राॅपर्टी वाचविण्याकरीता महाराष्ट्रातील तसेच देशातील आमदारांनी स्वत:च्या पक्षाशी गद्दारी करून भाजपचे तळवे चाटण्यात धन्यता मानली आहे त्यात महाराष्ट्रातील ५० आमदारांचा समावेश आहे.झेलमधे जायला संजय राऊत साहेबांसारखी जिगर लागते तशी जिगर या गद्दार आमदारांमधे नाही त्यामुळेच हे दिवस महाराष्ट्राच्या नशीबी आज आले आहेत.
बाण हा शिवसेनेचाच आहे उद्धवसाहेबांचाच राहणार…५० आमदार व १२ खासदार गेले म्हणून आपला धनुष्यबाण ते घेऊ शकत नाहीत.१९६६ सालापासून याच शिवसेनेने बाणाच्या चिन्हावर अनेक नगरसेवक,आमदार,खासदार,मंत्री,मुख्यमंत्री घडविले.गरीबातल्या गरीबाला तिकिट दिल आणि बाणाच्या चिन्हावर निवडून आणल.काही गरीब जे रीक्षा चालवित होते,पानटपरीवर पान लावत होते,हमाली करीत होते,रस्त्यावर भाजीपाला विकत होते त्या गरीबांना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांनी तिकीट दिली बाणाच्या चिन्हावर निवडून आणल पण तेच गरीब आज करोडपती झाले अब्जोपती झाले आणि शिवसेनेचा मालक व्हायची स्वप्ने पाहू लागले.एवढच काय तर ज्या चिन्हावर ते निवडून आले ते चिन्ह व तो पक्षच आपल्या बापाचा समजू लागले…गरीब म्हणून ज्यांना विस्थापितांच प्रस्थापित केल ही शिवसेनेची मोठी चूक झाली का ?
आमदार खासदार गद्दार झाले म्हणून आख्ख्या शिवसेनेचे ते मालक कसे होऊ शकतात.शिवसेना ही निष्ठावांत शिवसैनिकांची आहे.निकाल काहीही लागो कायद्याची लढाई काहीही होवो पण आता फक्त लढायच आणि शिवसेनेला जिंकूण द्यायच हाच मनात निश्चय बाळगायचा आहे.गद्दार आमदार बाणावर दावा करू शकतात पण शिवसैनिकांच्या ह्रदयावर दावा करू शकणार नाही शिवसैनिकांच्या ह्रदयात फक्त शिवसेनाच असेल मग त्याच चिन्ह काहीही असो शिवसेनेचा भगवा हा फडकणारच.
जय महाराष्ट्र.
अतुल श्रावण भवर,सोलापूर.
मो नं ९९६००९०००१.