एकनाथाला शिवसैनिकांचे
तळतळाट भोवणार !
एकेकाळी मामुली रिक्षा चालक व फिशरी कंपनीतील कामगार असलेले सडकछाप एकनाथ उर्फ एक्की आज वैयक्तिक मानपान व पद लालसेने शिवसेनेशी गद्दार झाले.आज संपूर्ण महाराष्ट्रातील समस्त शिवसैनिकांत रोष व्यक्त केला जात आहे. या संतप्त पुरूष व महिला शिवसैनिकांचा तळतळाट एकनाथ शिंदे यांना भोवणार व या घातकी शिंदे चा घात वा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही.
पक्षात मान सन्मान मिळत नाही, निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही, महाविकास आघाडी मुळे शिवसैनिकांची फरफट होत आहे, अशी तकलादू कारणं देत एकनाथ शिंदे यांनी बंड नव्हे तर पक्षद्रोह केला आहे. हा पक्षद्रोह करताना शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या अनेक आमदारांना भूलथापा देत, धाक दपटशा दाखवत प्रथम सूरतला नेऊन स्वतः सह त्यांचीही बदसूरत करून भवितव्याची वाट लावली. या आमदारांना एकनाथ शिदेंचे समर्थक म्हणून नव्हे तर शिवसेनेचे उमेदवार म्हणूनच विश्वासाने निवडून दिले. वैयक्तिक स्वार्थ व अतिमहत्वाकांक्षेपोटी शिवसेनेच्या आमदारांना वेठिस धरले व ओलीस ठेवले आहे. गणेश नाईक यांनी गद्दारी करताच एका नवख्या शिवसैनिकाने सिताराम भोईर यांनी नाईकांचा पराभव केला होता.छगन भुजबळ या दिग्गज नेत्याने गद्दारी करताच बाळा नांदगावकर यांनी भुजबळ यांचा पराभव केला होता. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. यापासून या वाट चुकलेल्या आमदारांनी बोध घेतला पाहिजे.
धर्मवीर आनंद दिघे यांचा कट्टर शिष्य म्हणवणारा व धर्मवीर मु.पो.ठाणे या चित्रपटातून शिंदेंनी स्वतः चे जे ब्रांडिंग केले,त्यामधे या बंडाची बिजं पेरलेली होती, असे आता वाटू लागले असले तरी मी याबाबत त्याचवेळी जाहिर केले होते.वास्तविक दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्या मुलांचे दु:खद निधन झाल्यानंतर या दु:खातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांना सभागृह नेते पदाचा राजीनामा द्यायला लावून एकनाथ शिंदे यांना राजकारणात पाय रोवण्यासाठी जागा बनवून दिली,त्याच दिघे साहेबांच्या चित्रपटाच्या नावे शिंदेंनी व्यवसाय केला आणि स्वतः चा उदोउदो करून घेतला. असे अनेक कपोलकल्पित प्रसंग जागोजागी पेरले आहेत. यातला एक प्रसंग तर इतका खोटा आहे की,या आभासी दिघे भक्ताची किव येते.
सिंघानिया हॉस्पिटल मधे दिघे साहेबांचे निधन होते.तेंव्हा संतप्त शिवसैनिक व दिघेप्रेमी हॉस्पिटलला आग लावतात. त्यावेळी एकनाथ शिंदे हे तिथे प्रत्यक्ष उपस्थित नसताना चित्रपटात मात्र एकनाथ शिंदे हे दिघे साहेबांचे पार्थिव खांद्यावर घेऊन बाहेर पडतात,असा तद्दन खोटा प्रसंग रंगवला आहे. प्रत्यक्षात दिघे साहेबांचे पार्थिव रूग्णालयाच्या स्टाफने सुखरूप हॉस्पिटल च्या खाली आणले होते,हे सत्य ज्ञात असलेले माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक जीवंत आहेत. या एकच उदाहरणावरून एकनाथ शिंदे च्या खोटारड्या वृत्तीचे दर्शन होते. चित्रपटातील तो प्रसंग खरा आहे,हे एकनाथ सिद्ध करू शकणार नाही.
आज तब्बल अडिच वर्षे सत्ता भोगणारे केबिनेट मंत्रीपद व दोन दोन जिल्ह्यांचे पालक मंत्री पदी विराजमान होऊन समृद्धीच्या महामार्गावर सूसाट धावणारी एकनाथ शिंदे यांची एक्सप्रेस आज अचानक हिंदूत्व,बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक, शिवसैनिकांची होणारी कुचंबणा या सारख्या तकलादू कारणांची यादी पुढे करून आपल्या गद्दारीचे समर्थन करू पाहत आहेत.
पक्षात मानसन्मान मिळत नाही,निवडणूक प्रक्रियेत विश्वासात घेत नाही,इत्यादी इत्यादी फालतू कारणं देत सुटले आहेत. ही कारणं खरीही असतील पण आपण पुर्वी रिक्षाचालक व फटिचर होतो,केवळ शिवसेना या चार अक्षरांची पुण्याई व दिघे साहेबांची कृपादृष्टी यामुळे यामुळे एकनाथ चा शिंदे साहेब झाले, केबिनेट मंत्री, शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते इतकी मोठी झेप घेतली. स्वतः चा मुलगा जो कधीही ग्रामसेवक ही नव्हता तो दोन वेळा खासदार झाला,तरी यांचे मन व पोट भरत नसेल तर यांची बकासूरी वृत्ती शमली नाही,हेच दर्शवते.
एकवेळ आपण एकनाथ शिंदे यांचे म्हणणे तात्पुरते मान्य जरी केले तरी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी निषेध म्हणून मंत्री पदाचा राजीनामा दिला असता तरी पक्षश्रेष्ठी व शिवसैनिकांनी शिंदेंबद्धल सहानुभूती व्यक्त केली असती. आज लाखो शिवसैनिक कित्येक वर्षे सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आयुष्य व्यतित करीत आहेत.त्यांना आयुष्यात मानसन्मान व पदं मिळाली नाहीत तरी ते शिवसेनेशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले आहेत.अतिमहत्वकांक्षी नेते सत्तेसाठी पक्षाशी गद्दारी करून अन्य पक्षांशी शैयासोबत करून सौदेबाजी करतात,तेंव्हा वारांगणाही शरमेने मान खाली घालत असतील.
एकनाथ शिंदेनी 1997 पासून 2022 पर्यंत नगरसेवक पदापासून केबिनेट मंत्री पदापर्यंत सर्व पदं उपभोगली आहेत.त्यांनी ज्या पक्षाने मानसन्माव व ऐश्वर्य प्राप्त करून दिले,रिक्षाभाड्यापोटी 50-100 रूपये मिळवणा-याच्या घरी आज कुबेर अवतारले आहे,त्यानेच आपल्या पक्ष प्रमुखाला,स्वर्गीय बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न करणे,शिवसेनेची सत्ता उलथून टाकण्याचा अघोरी प्रयत्न करणे तोही विरोधी पक्षाच्या भूलथापांना व आमिषांना भूलून! पक्षद्रोह करण्यासारखे मोठे पातक नाही.आणि नियती अशा पक्षद्रोह्यांना कधीच माफ करणार नाही.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470