मा.उद्धव साहेब आपण सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या मनावर राज्य केले,पदावरून जाताना आपल्या साठी रडणारे महाराष्ट्रीयन बघितले….आपले खूप खूप अभिनंदन…. मा. उद्धव जी ठाकरे साहेब मी तुमचा शिवसैनिक ही नाही की राजकारणी ही नाही पण आज तुम्ही ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद सोडण्याचा व राजकारणात आदर्श कसे असावे असा जो सुसंस्कृत पना आपण दाखवला तो सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणसाला खूप भावला माझ्या सौभाग्यवती ना तर आपले प्रगटन सुरू असताना रडू कोसळले.हीच भावना बऱ्याच व्यक्तींनी व्यक्त केली. राजकारणात फार वर्षानंतर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण,वसंत दादा पाटील,वसंतराव नाईक,शरदराव पवार यांचेनंतर कुणीतरी लोकनेता म्हणून जनतेला आपले वाटायला लागणारे आपण मुख्यमंत्री झालात आपले अभिनंदन. जे आज शिवसेनेत घडले तसे देशाचे राजकारनात १९७७च्या काळात काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली होती व इंदिराजी एकट्या पडल्या होत्या,परंतु दोनच वर्षात त्या पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्यात,सांगायचे तात्पर्य राजकारणात वेगवेगळ्या कारणांनी अशी परिस्थिती येते कोण बरोबर कोण चूक हे काळ ठरवीत असतो. पण त्या काळात संयम ठेवून आपले संस्कार व वैचारिक घालमेल होऊ न देता सुसंस्कृत पद्धतीने वागणे हे फारच महत्वाचे असून महाराष्ट्र हा आजही देशाला मार्गदर्शक आहे हे आपण सिध्द केले,आपल्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
एस. बी.नाना पाटील