तांदुळवाडी येथे शिवराज्यभिषेक दिन उत्सहात साजरा
प्रतिनिधी – अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवराज्यभिषेक दिन सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. राजदंडकाजवळ जिजाऊ वंदना व राष्ट्रगीत घेण्यात आली.राजकीय सत्तेमध्ये मराठा दौलतीच्या व्यक्तीला राजा पदाचे अधिकार प्राप्त करून देणारा राजशिष्टाचार रुपी एक धार्मिक विधी म्हणून त्याकाळी राज्यभिषेकला पाहिले जात होते.आज देखील त्याला अनन्य साधारण महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यभिषेक तमाम महाराष्ट्रासह देशातील नागरिकांसाठी एक क्रांतिकारक आणि प्रेरणादायी घटना आहे.
ग्रामपंचायत कार्यालयामधील शिवध्वजाची पूजा सरपंच रणजितसिंह पाटील व उपसरपंच किरण गवळी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच ग्रामसेवक केवटे भाऊसाहेब यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच रणजितसिंह पाटील,उपसरपंच किरण गवळी, ग्रामसेवक भाऊसाहेब केवठे, सोसायटीचे चेअरमन तथा पत्रकार अतुल गवळी, व्हा. चेअरमन वैजूनाना गवळी, ग्रा. पं. सदस्य अजिनाथ कनिचे, स्वाभिमानीचे अजिनाथ परबत, वृक्षप्रेमी गणेश परबत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू अनपट, शिक्षक प्रतापसिंह कदम, बळीराम काळे, संभाजी ब्रिगेडचे शांतीलाल गवळी, प्रहारचे दिगंबर गवळी, सुमंत गवळी, अक्षय परबत, अभिजित परबत, वैभव भोसले, राहुल घोलप, पृथ्वीराज गवळी, श्रीकांत कादे, पप्पू माने, मंगेश गवळी, ओम जाधव, पृथ्वीराज जाधव, प्रतीक परबत, सुभान मुलाणी, अमोल गवळी, सुदर्शन परबत, केशव गवळी, अजित गवळी, बालाजी गवळी, महादेव गवळी, राजाभाऊ गवळी, माधव गवळी, सोमनाथ जाधव, बाळासाहेब कदम, कुंडलिक गवळी, दादा माने, विजय परबत, अनिकेत चव्हाण, तुकाराम गवळी ग्रा. पं. शिपाई अतुल परबत, बालाजी गवळी आदी शिवभक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.