June 30, 2025 1:10 am

वरकुटे खुर्द गावांमध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

वरकुटे खुर्द गावांमध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्घाटन
प्रतिनिधी/अजिनाथ कनिचे
इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम2022-23उद्घाटन समारंभ पार पडला.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच ,उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक नवनाथ बोराटे, तसेच समस्त ग्रामस्थ आणि शेतकरी वर्ग उपस्थित होते. याच प्रमाणे रत्नाई कृषी महाविद्यालयातील उद्यान विद्या विभागाचे प्रमुख प्रा .एस .एस .भोसले सर ,वनस्पती विकृती शास्त्र विभागातील तज्ञ डॉ .डी.एस.ठवरे सर, कृषी वनस्पतिशास्त्र विभागातील तज्ञ प्रा .ए.बी.तमनर सर उपस्थित होते. कृषिदूतांनी शेतकर्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक तुषार शेंडे सरांचे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले
कृषि विद्यापीठातील सुधारीत तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षीके, प्रत्यक्ष भेटी ,प्रचारसभा, चर्चासत्रे ,मेळावे ,प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे कृषी उत्पादन वाढीमध्ये मोलाची भर पडली तसेच अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झालो असलो तरी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता हे राज्याचे एकमेव उद्दिष्ट नसून शेतकऱ्यांना उपलब्ध संसाधनाचा परिपूर्ण वापर करून अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देणे नितांत गरजेचे आहे. यासाठी व्यापारक्षम शेतीची कास धरावी लागेल असे तुषार शेंडे सर म्हणाले .तसेच त्यांनी मुक्त आर्थिक व्यवस्था व जागतीक व्यापार व्यवस्थेचा फायदा करुन घेण्याच्या दृष्टिने कृषि फलोत्पादन व जलसंधारण क्षेत्रात कृषी उत्पन्नात वाढ ,निर्यातीत वृद्धी व कृषि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या अनेकविध योजना राबवण्यात येत आहेत असे सांगितले. अशाप्रकारे शेतीव्यवसायातून स्वयंपूर्ण तेव्हा बरोबरच आर्थिक उन्नती साधणे व जागतीक शेतमालाच्या बाजारपेठेत महत्वाचे स्थान मिळविणे या निर्धाराने कृषि विभागाची वाटचाल सुरू आहे असा संदेश शेतकऱ्यांना दिला.
तसेच आपण जे उत्पादन घेतले आहे त्यामधून आपल्याला मिळालेले पैसे गुंतवून आपण कसा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकतो हे त्यांनी पटवून दिले.
सर्वसाधारणपणे पाच ते सहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने दोन ते तीन उच्चशिक्षित डॉक्टरांची गरज असते तसेच तीन ते चार कृषी पदवीधर स्वतः शेती करीत असतील तर त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल शेतीचे हंगाम नुसार नियोजन करणे गरजेचे आहे यासाठी कृषी विषयक ज्ञानाची माहितीची गरज आहे कृषी तज्ञ हे ग्रामीण भागात कृषी विषयक मार्गदर्शन व सल्लागार म्हणून कार्यरत असल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच फायदा होईल असे डॉ .डी.एस.ठवरे सर महाविद्यालयाच्या वतीने मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा . श्री .जयसिंह मोहिते पाटील तसेच रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे सर व कार्यक्रम समन्वयक अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे सर यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमामध्ये कृषिदूत आकाश शेलार, औदुंबर शिंदे ,विकास भुई ,स्वप्निल ताम्हाणे, रणजितसिंह भगत , श्रीनिवास चौधरी ,विराज मगर यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची माहिती देऊन, पिकांवरील रोग, त्याचे नियंत्रण, फवारणी ,माती परीक्षण जनावरांचे लसीकरण, उत्पादनवाढीचे तंत्र तसेच विविध शासकीय योजनांविषयी माहिती देऊन जनजागृतीचे आश्वासन देऊन कार्यक्रमाचे सांगता केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!