June 30, 2025 5:06 am

आनंद दिघेंच्या मृत्यूभोवती संशयाचे भूत निर्माण करणारा अखेर !

अपनी भाषा में पढ़े! Translate

काल पुन्हा एकदा धर्मवीर चित्रपट पाहिला.पहिल्यावेळी शेवटी चित्रपटाची श्रेयनामावली सुरू होताच मी चित्रपट गृह सोडले होते.त्यामुळे शेवटाच्या शेवटी जे एक गंभीर वाक्य आहे ते ऐकायचे राहून गेले.ते वाक्य काल लक्षपूर्वक ऐकले आणि धर्मवीर मु.पो.ठाणे या चित्रपटाला नेमके काय अभिप्रेत आहे तेच कळेनासे झाले ! कारण आधीच या चित्रपटाने आनंद दिघे साहेबांच्या आश्रमाचे विकृत चित्रिकरण केल्याने व गाडून टाका त्याला ! हे दिघे साहेबांच्या तोंडी पेरलेले वाक्य, व त्यावर कहर म्हणजे त्या पिडित मुलीच्या आईचे वाक्य- साहेबांनी अशा प्रकारे कायद्याच्या चौकटी मोडून अनेकांना न्याय मिळवून दिला,हे वाक्य दिघे साहेबांची भलामण करण्यासाठी आहे की,एक क्रूरकर्मा नेता आहे,हे दर्शविण्यासाठी हेच कळत नाही.दिघे साहेबांनी अशा प्रकारे अनेकांना गाडून‌ टाकले ? असा याचा अर्थ ध्वनित होतो.दिघे साहेब सिंघानियात असताना प्रथम राज ठाकरे येतात व लवकर बरे व्हा,अशा शुभेच्छा देऊन निघुन जातात.त्या पाठोपाठ नारायण राणे येतात व आपण आता विश्रांती घ्या ! असे सूचक वाक्य बोलतात.नंतरची वाक्य काय बोलतात,हे श्रोत्यांना ऐकू जाऊ नयेत म्हणून म्युट ठेवली आहेत. आणि महत्वाचे म्हणजे दिघे साहेबांना पायाला लागले होते,बाकी सर्व सामान्य होते,परंतू नारायण राणे बाहेर पडताच दिघे साहेबांना हार्ट अटॅक येतो. या घटनेत खुप मोठे रहस्य दडलेले आहे.नारायण राणे हे दिघे साहेबांनी ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजिनामा द्यावा, असा संदेश‌ आणतात,त्यामुळे,’हेच काय फळ मम तपाला,’ असे विचार मनात येऊन दिघे साहेबांना हार्ट अटॅक येतो,असाच याचा अर्थ निघतो. त्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे येतात व उद्धवजी राजना म्हणतात,राज तू स्वतःला सावर ! या वरून राज ठाकरे व दिघे साहेबांमधील जिव्हाळा अधोरेखित होतो. दिघे साहेबांच्या न भूतो‌ न भविष्यती ! अशा अंत्ययात्रेत कोणी मोठा नेता दिसत नाही. यावरूनच नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी दिघे साहेबांच्या मृत्यू भोवती संशयाचे धुके निर्माण केले होते , त्यास पुष्टी मिळते. या चित्रपटाच्या माध्यमातून हे धुके दूर करण्या ऐवजी निर्मात्याने आणखीनच गुंतागुंत वाढवली आहे. यावरून या चित्रपटाच्या निर्मात्याचा नेमका हेतू काय असावा ? याचा थांगपत्ता लागत नाही,उलट शेवटी तर -दिघे साहेबांची ही कथा इथेच संपत नाही,असे सांगून दुसऱ्या भागाचे सूतोवाचच केले आहे.पहिल्या भागातच निर्मात्याने व त्याच्या फायनान्सरने दिघे साहेब,आनंद आश्रमाची कार्यशैली व इमेजची पार वाट लावली आहे.1987 चा प्रकाश परांजपेंच्या महापोर निवडणूकीत सतिश प्रधान एका जोकर सासखे दाखवले आहेत तर ज्यांचा त्यावेळी दिघे साहेबांशी जवळचा संबंध नव्हता ते निकटवर्तीय दाखवले आहेत. दिघे साहेबांच्या पार्थिवाला हॉस्पिटलातून खांद्यावरून बाहेर आणण्याचा प्रसंग, भिवंडी दंगलीचा प्रसंग व नदीवरील गुरूपूजन असे खोटे,अतिरंजित प्रसंग दाखवून,राजन विचारेला सारथी दाखवून निर्मात्याने धंदेवाईकपणा केला आहे, कोणाचे तरी ब्रान्डिग करण्याच्या नादात मलंग गड आंदोलन,दुर्गाडी आंदोलनाचा गळा घोटला आहे. झाले तितके पुरे झाले आता दुसरा भाग काढून नवीन पिढीसमोर काल्पनिक इतिहास मांडू नका.किमान इतिहासाशी प्रामाणिकपणा निर्मात्याने दाखवायला हवा होता व दिघे साहेबांच्या मृत्यूचे गूढ उकलता आले नाही तरी हरकत नव्हती पण दुसऱ्या भागाच्या मोहापायी दिघे साहेबांच्या मृत्यू भोवतीचे जाळे गडद करायला नको होते.

दिलीप मालवणकर

9822992470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!