भिगवण व परिसरातील वीज पुरवठा वारंवार बंद होत असल्याने नागरिक हैराण
(निलेश गायकवाड)
प्रचंड उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना बुधवारी व गुरुवारी मध्यरात्री महावितरणने तब्बल दोन तास वीज पुरवठा खंडित करीत जोरदार झटका दिला याबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.
वाढत्या तापमानाने ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुले हैराण झाली आहेत पंखे कुलर एसी रात्रंदिवस सुरू ठेवत उन्हापासून आराम मिळावा म्हणून सर्वांचा खटाटोप सुरू आहे. सलग दोन दिवस महावितरणने मध्यरात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित केला त्याचा त्रास लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागला .गेल्या दोन-तीन वर्षात वीज पुरवठा अखंडितपणे सुरू होता मात्र आताच हा खंडित केला जात आहे .असा सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत .विज जाण्याचे कोणते वेळापत्रक महावितरणकडे उपलब्ध नाही. त्यामुळे वीज केव्हा जाईल याचा नेम नाही .लोडशेडिंग असेल तर त्याचे वेळापत्रक उपलब्ध करून द्यावे तसेच रात्री वीज पुरवठा बंद करू नये अशी मागणी होत आहे.
सहाय्यक अभियंता महावितरण – राजेश भगत
उन्हामुळे सध्या विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. लोडशेडिंग होत आहे. मात्र याबाबतची वेळापत्रक आलेली नाही.त्यामुळे आम्ही सदर विजेच्या संदर्भात वेळापत्रकाची मागणी केलेली आहे.