June 30, 2025 9:15 pm

स्थानिक क्षेत्रात विश्वास महत्त्वाचा भाग असून आत्मनिर्भर बनण्यासाठी त्याची गरज आहे- रावसाहेब दानवे

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्थानिक क्षेत्रात विश्वास महत्त्वाचा भाग असून आत्मनिर्भर बनण्यासाठी त्याची गरज आहे- रावसाहेब दानवे
प्रतिनिधी डॉ.संजीव पाटील
स्थानिक क्षेत्रात विश्वास महत्त्वाचा भाग असून तो नेहमीच मुख्य भूमीका बजावतो, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. ते आज नवी मुंबईतल्या जिओ जागतिक कंनवेंशन केंद्रात रत्न आणि दागिने प्रदर्शनी २०२२ प्रदर्शनीच्या उद्घाटनानंतर बोलत होते. या वेळी या प्रदर्शनाशी संबंधीत पुस्तिकेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं.

रत्न आणि दागिने क्षेत्र विश्वासाच्या पायावर उभं आहे. स्थानिक स्तरावर उत्पादन करणाऱ्या दागिने निर्मात्यांनी सोन्याच्या दागिन्यां बाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करावा असंही ते म्हणाले.

कोरोना काळात गरिबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत अन्न धान्य वाटप करून केंद्र सरकारनं लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला होता. विश्वास हा सोन्याच्या दागिन्यापेक्षा मुल्यवान असल्याचं ते म्हणाले. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!