राज्याच्या काही भागात पुढील २ दिवस उष्णतेची लाट कायम
राज्यात, विशेषतः विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट पुढचे दोन दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात काल चंद्रपूर इथं सर्वाधिक ४३ पूर्णांक ६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेले. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांनी चाळीस अंश सेल्सिअस तापमान ओलांडलं आहे तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांचं तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेलं आहे.
येत्या ४ आणि ५ एप्रिलला दक्षिण कोकण आणि विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. तर पुढचे दोन दिवस मालेगांव, चंद्रपूर, अकोला, लातूर, जळगांव इथं उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.