मुंबई महानगरपालिकेद्वारे सार्वजनिक ठिकाण मास्क घालण्याची सक्ती मागे
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
मुंबई महानगरपालिकेने कालपासून सार्वजनिक ठिकाण मास्क घालण्याची सक्ती मागे घेतली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास कोणताही दंड आकारण्यात येणार नाही असं महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटल आहे. आगामी सणवार लोकांना आता कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरे करता येणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर संदेशात म्हंटल आहे. मात्र, सावधगिरीचा उपाय म्हणून, सार्वजनिक ठिकाणी, विशेषकरून गर्दीच्या ठिकाणी जनतेने स्वतःहून मास्क घालावेत असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.