गुढी पाडव्याच्या मुर्हतावर महाराष्ट्र आजपासून निर्बंधमुक्त
राज्यात लागू असलेले कोविड निर्बंध आजपासून हटवण्यात येत आहेत.कोविड महामारीमुळे राज्यात गेले ७३६ दिवस लागू असलेले निर्बंध आजपासून हटवण्यात येत आहेत.
यासोबतच आपत्कालिन व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येत आहे. त्यामुळे प्रवास, रेल्वे, रेस्टोरंट या ठिकाणी उपस्थितांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही. निर्बंध हटवल्यामुळे आज गुढीपाडव्याचा उत्साह संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. निर्बंधमुक्त वातावरणात आज ढोल, लेझीम पथकांसह सगळीकडे जल्लोषात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या.
आजपासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. रेल्वे प्रवासासाठी दुहेरी लसीकरणाची सक्ती यापुढे असणार नाही. मास्क मुक्ती नसली तरीही लोकांनी सुरक्षिततेसाठी मास्क वापरावेत असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.