संजय गांधी निराधार योजनेतील पुणे जिल्हा महाराष्ट्रातील एक नंबरचा जिल्हा-सागर बाबा मिसाळ यांचे उद्गार.
प्रतिनिधी :डॉ. सिद्धार्थ सरवदे.
संजय निराधार योजनेचे काम महाराष्ट्रामध्ये अतिशय छान आणि जलद गतीने चालू आहे. यामध्ये पुणे जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर जिल्हा आहे असे मत इंदापूर तालुक्याचे संजय निराधार योजनेचे अध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांनी व्यक्त केले. संजय निराधार योजनेमध्ये एकूण 484 प्रकरणांपैकी फक्त दहा प्रकरणांना कागदपत्रांची पूर्तता योग्य न केल्यामुळे मंजुरी मिळाली नाही बाकी 474 प्रकरणे ही मंजूर झाली आहेत. या योजनेतून अनेक गोरगरीब, विधवा ,अपंग अशा लोकांना खूप मोठा फायदा झाला आहे. ही योजना पूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे.पण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आणि हिरीरीने आणि अतिशय प्रामाणिकपणे गावोगावी जाऊन सागर बाबा मिसाळ हे आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत. आदरणीय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार तसेच आदरणीय आमदार आणि राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे काम हे पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय जलद गतीने चालू आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग होत आहे हा खूप महत्वाचा आणि अभिमानास्पद उपक्रम आहे. पुणे जिल्ह्यातील आणि इंदापूर तालुक्यातील गावातून आणि जनतेतून सागर बाबा मिसाळ यांना खूप आशीर्वाद मिळत आहेत व त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.