June 30, 2025 8:43 pm

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा
प्रतिनिधी-अर्जुन आहेर

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधे उष्णतेची तीव्र आणि दीर्घ लाट येण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. या परिसरात कालपासूनच तापमानात वाढ होऊ लागली ती आजही कायम राहील असा अंदाज आहे.

गेले काही दिवस तापमान ३९ अंश सेल्सियसच्या आसपास असून सरासरी तापमानापेक्षा ते ६ अंशांनी जास्त आहे. या काळात दुपारी १२ ते ३ या वेळात उन्हात जाणं टाळावं तसंच शरीराचं तापमान आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीनं पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रवरुप पदार्थांचं सेवन करावं असा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!