अमळनेरचे प्रा. प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय काव्य पुरस्कार संघर्षातून उमटलेले संवेदनांचे शब्द
अमळनेर : विक्की जाधव
शब्दांच्या ओळींतून समाजाचे दुःख आणि स्वतःच्या वेदना मांडणाऱ्या यशपंढरी इंग्लिश क्लासचे संचालक, अमळनेरचे नवोदित साहितिक प्रा. प्रकाश पाटील यांना “सांगा ना पप्पा, माझं काय चुकलं?” या प्रभावी कवितेसाठी राज्यस्तरीय काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगमनेर येथे फुलोरा कलेचे माहेरघर आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांना हा सन्मान मिळाला. प्रा. पाटील हे दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही जीवनातील संघर्षावर मात करत, सामाजिक भान जपणारे लेखन करतात. त्यांच्या कवितांमध्ये केवळ शब्द नाहीत, तर आयुष्याच्या जखमा, समाजावरील प्रश्न आणि बदलासाठीची हाक दडलेली असते. त्यांच्या या यशामुळे अमळनेरच्या साहित्यविश्वात अभिमानाची भर पडली आहे.
