विजेअभावी इंदापुरातील पिके जळून जात असताना राज्यमंत्री भरणे वीज तोडणी बाबत का गप्प आहेत? हर्षवर्धन पाटील यांनी भरणे यांच्यावर डागली तोफ..!
तक्रारवाडी प्रतिनिधी श्री युवराज काळंगे भिगवण सध्या शेती पंपाची वीज तोडणी मोहीम वेगात सुरू आहे विजया भावी शेतातील उभी पिके जळून जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे राज्य सरकारने तात्काळ वीज तोडणी मोहीम थांबवावी अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री भरणे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी बघत आहेत मात्र शेतकऱ्यांचे वीज तोडणी मोहिमे संदर्भात गप्प असून एक शब्द हि बोलत नाहीत असा घणाघाती आरोप हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री भरणे यांच्यावर केला आहे.
आघाडी सरकारने वीज तोडणी मोहीम थांबवुन शेती पंपाचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करावा अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले राज्य शासनाचे काम शेतकरी वर्गाला सहकार्य करण्याचे असते मात्र सध्याचे महा विकास आघाडीचे सरकार हे वीज रोहित्र बंद करून शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत हे शासन सत्तेवर आल्यापासून प्रत्येकी तीन-चार महिन्याला वीज तोडणी मोहीम राबवून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे काम करत आहे सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळे पिकांना पाण्याची गरज असताना राज्य सरकारकडून पाणी असूनही वीज बंद करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचा हा प्रकार सुरू आहे अशी टीकाही हर्षवर्धन पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांना महावितरणकडून आलेली बिले अवाच्या सव्वा अशी आहेत सदरची बिले दुरुस्त करणे गरजेचे आहे दोन वर्षापासून प्रत्येक वीज तोडणी मध्ये शेतकऱ्यांकडून काही रक्कम महावितरण कडून वसूल केली जात असून थकबाकी चे मूळ दुखणे कायम राहत आहे सध्या शेतीपंपाची वीज खंडित करण्यात येत असल्याने शेती धोक्यात आली आहे.
शेतकरी अजूनही कोरोना च्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना महावितरण ने शेतीपंपाची वीज तोडणी मोहीम त्रिव केल्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विकास आघाडी सरकारने मोहीम थांबून शेती पंपाच्या वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरू करावा अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला.