फक्त दोन हेक्टरपर्यंत भरपाई? सरकारच्या निर्णयाला अमळनेरात संतप्त विरोध..
अमळनेर : विक्की जाधव
राज्य सरकारने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानीच्या भरपाईत कपात करत ती ३ हेक्टरवरून २ हेक्टरपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराणा प्रताप चौकात जिल्हा परिषद विश्रामगृहासमोर जोरदार घोषणा आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी निधी वळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काच्या भरपाईत कपात करणाऱ्या महायुती सरकारचा या आंदोलनात तीव्र निषेध करण्यात आला. “शेतकरी विरोधी सरकार हाय हाय”, “नुकसान भरपाई आमचा हक्क आहे”, “झोपलेले सरकार जागं हो”, “शेतकऱ्यांना न्याय दो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी केले. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा असून, महाविकास आघाडी याला तीव्र विरोध करणार आहे. शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्यात येईल.”
आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, भागवत सूर्यवंशी, प्रा. सुभाष पाटील, सुलोचना वाघ, संदीप घोरपडे, योजना पाटील, विजय पाटील, डी.एम. पाटील, बन्सीलाल भागवत, प्रताप पाटील, मनोहर नाना पाटील, उमेश पाटील, प्रा. अशोक पवार, प्रशांत निकम, अरुण शिंदे, जाकीर शेख, अनंत निकम, योगेश शिसोदे, मनोहर पाटील, लतीफ मिस्तरी, कृष्णा पाटील, जिजाबराव पाटील, माधवराव पाटील, मुशीर शेख, रफिक मिस्तरी, जमील मुजावर, वासुदेव पवार, गजेंद्र साळुंखे, सुरेश पाटील, प्रा. श्याम पवार, प्रतापराव पाटील, अरुण देशमुख, सईद तेली, विलास पवार आणि बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.