पाडळसरे धरण प्रकल्पाच्या फाईलवर उद्या सोमवारी केबिनेट निर्णय अपेक्षित; पुढील टप्प्यावर आशा आणि अनिश्चिततेचं सावट
अमळनेर : विक्की जाधव
तालुक्यातील बहुचर्चित आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेला निम्न तापी प्रकल्प (पाडळसरे धरण) आता निर्णायक टप्प्यात पोहचेल अशी अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाला नुकतीच PIB (Public Investment Board) कडून सैद्धांतिक मान्यता मिळाल्यानंतर, या प्रकल्पाची अंतिम मंजुरीसाठीची फाईल उद्या सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची समिती (Cabinet Committee on Economic Affairs) समोर मांडली जाणार आहे.
यामुळे धरणाच्या पुढील प्रक्रियेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नक्कीच आमदार बी एस पाटील. आमदार कृषी भूषण साहेबराव पाटील. आमदार शिरीष चौधरी. आणि आमदार अनिल पाटील. खा. स्मिताताई वाघ या सर्वांच्या प्रयत्नांना यश येणार अमळनेर तालुका सुजलाम सुफलाम होणार. अन याचे श्रेय कोण घेणार?? “मी” असो…
प्रकल्पासाठी PIB कडून सकारात्मक शिफारस प्राप्त झाल्यानंतर, केंद्रीय पातळीवर अंतिम निर्णयासाठी ही बाब मंत्रिमंडळासमोर ठेवली जाते. ₹५०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या प्रकल्पांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य असते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या सोमवारी ही फाईल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीपुढे सादर केली जाईल. यानंतर एकदा मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला गती मिळणार आहे. धरण संघर्ष समितीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी वर्गामध्ये या बातमीमुळे उत्सुकता आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशी असेल पुढील प्रक्रिया ?
PIB कडून सैद्धांतिक मान्यता घेतल्यावर
केबिनेट मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीकडून अंतिम मंजुरी मिळेल त्यानंतर
निधी वितरीत करण्यासाठी अर्थमंत्रालय आणि संबंधित मंत्रालय यांच्यातील सहमती मिळेल मग
प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया हा टप्पा पर पडेल मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
मात्र काही संभाव्य अडचणी पुढील टप्प्यांवर अडथळा ठरू शकतात:
1. जमीन अधिग्रहण व पर्यावरण मंजुरीशी संबंधित बाबी प्रलंबित असल्यास केबिनेट निर्णय पुढे ढकलला जाऊ शकतो.
2. प्रकल्प खर्चातील वाढ किंवा तांत्रिक फेरमुल्यांकनाची मागणी झाल्यास निर्णयाला विलंब होऊ शकतो.
3. काही वेळा राजकीय पातळीवर धोरणात्मक बदल, किंवा इतर प्रकल्पांना प्राधान्य दिल्यास ही मंजुरी ‘होल्ड’ ठेवली जाते.
या प्रक्रियेला किती वर्ष लागतात हे सांगणे जिकरीचे ठरेल. PIB (Public Investment Board) चे सर्वच प्रकल्प 100% पूर्णतःवास जातात हे ही सांगता येत नाही. परंतु अमळनेर तालुक्याला असे दाखवले जात आहे की हा प्रकल्प 100% पूर्ण होईल. यासाठी आमदार आणि खासदार यांचे योगदान महत्वाचे असेल.
त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी मार्मिक त्यांचा यथोचित सत्कार करेल ( वेळेवर )
पत्रकार : विक्की जाधव. 9175050300
भाग 4 लवकरच