अमळनेर वारे निवडणुकीचे — प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला सुरूवात, नागरिकांमध्ये उत्सुकता
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम रंगत आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ताज्या आदेशानुसार, शहराच्या प्रभागरचनेची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार असून, या निर्णयाने राजकीय व नागरी वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उमेदवारांनो पालिका लढवायची तयारी करताय ?
आता मार्मिक करणार तुमचा प्रचार प्रसार.. संपर्क : करा. 9175050300
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 10 जून 2025 रोजी काढलेल्या आदेशानुसार, 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे प्रभागांची संख्या आणि मर्यादा नव्याने ठरवण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागात लोकसंख्या सम प्रमाणात राहील यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन केले जाणार आहे.
प्रभाग रचना करताना शहरातील नैसर्गिक मर्यादा, गल्ल्या, रस्ते, वस्तींचे समूह आणि सामाजिक-सांस्कृतिक समृद्धी यांचा सखोल विचार केला जाणार आहे. विशेष म्हणजे, अनुसूचित जाती-जमातींच्या वस्त्यांचे विभाजन टाळण्यावर भर दिला जाईल.
शहराच्या प्रगतीचा नवा आराखडा!
हे आदेश म्हणजे अमळनेर शहराच्या व्यवस्थापनात एक नवा शिस्तबद्ध अध्याय सुरू होण्याची नांदी आहे. गुगल मॅपच्या सहाय्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रभागांची नकाशेवाटणी केली जाणार आहे.
नागरिकांना मिळणार सहभागाचा हक्क
प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नागरिकांना आपल्या हरकती व सूचना देण्याची संधी दिली जाणार आहे. ऐतिहासिक, सामाजिक आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन अंतिम प्रभाग रचना ठरवली जाईल.
प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक प्रक्रिया ठेवत ही रचना लोकशाहीच्या अधिष्ठानात पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. शासनाच्या आदेशात गोपनीयता पाळण्याचेही स्पष्ट निर्देश दिले आहेत.
अमळनेरकरांनी या प्रक्रियेकडे केवळ निवडणुकीच्या दृष्टीकोनातून न पाहता, शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा टप्पा म्हणून पहावे, असे आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.