June 29, 2025 1:29 am

डेंग्यू निर्मूलन दिनानिमित्त आयुष्यमान आरोग्य मंदिर तक्रारवाडी अंतर्गत जनजागृती

अपनी भाषा में पढ़े! Translate

डेंग्यू निर्मूलन दिनानिमित्त आयुष्यमान आरोग्य मंदिर तक्रारवाडी अंतर्गत जनजागृती

(निलेश गायकवाड)

भिगवण : गेल्या सहा-सात वर्षांपासून डेंग्यू आजाराचा प्रसार वाढत चालला आहे. डेंग्युमुळे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात अनेकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे 16 मे हा राष्ट्रीय डेंग्यू निर्मूलन दिवस म्हणून आचरण्यात आणला जातो. या दिनाच्या माध्यमातून डेंग्युबाबत जनजागृती केली जाते. जिल्हा व आरोग्य कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने जिल्ह्यात जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यांचनिमित्ताने इंदापूर तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर तक्रारवाडी यांच्या वतीने मदनवाडी, तक्रारवाडी, परिसरात जनजागृती करण्यात आले.

यामध्ये डेंग्यू हा एडीस इजिप्ती डासांच्या चावण्यामुळे होतो. हा डास स्वच्छ पाण्यातून निर्माण होत असतो. बरेच जण घरगुती वापरासाठी पाण्याचा साठा करून ठेवतात. त्यातून या डासाची अधिक उत्पत्ती होते. या डासामुळे व्यक्तीला अधिक ताप येतो. डोके दुखते, डोळ्याच्या मागील भागामध्ये वेदना होतात. जेवणाची चव तसेच भूक नष्ट होते. अंगावर गोवरासारखे पुरळ येणे, मळमळणे आणि उलट्या होणे,अंगावर वर्ण उठणे ही डेंग्युची लक्षणे आहेत. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी मदनवाडी या गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
आले होते .

या कार्यक्रमासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मृदुला जगताप, आरोग्य सेवक मारुती गायकवाड, आरोग्य सेविका उषा दिवेकर यांनी सदर जनजागृती करत परिसरात अभियान राबविण्यात आले.

तातडीने तपासणी आवश्यक

सर्वसाधारण मे अखेर ते जून महिन्यामध्ये या आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत. डेंग्युमुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. त्यामुळे रुग्ण दगावू शकतो. तेव्हा या आजारापासून प्रत्येकाने संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ताप आल्यानंतर तो शरीरामध्ये अधिक दिवस राहिल्यास तातडीने डेंग्युची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हा जनतेने याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ.मृदुला जगताप यांनी केले आहे.

डेंग्युबरोबरच चिकुनगुनिया रुग्णही

डेंग्यू आजार रोखण्यासाठी संयुक्तपणे मोहीम राबविणे महत्त्वाचे आहे. याबाबत गेल्या काही वर्षांपासून जनजागृती केली जात आहे. तरीदेखील नागरिक याबद्दल गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामुळे अनेक जण दगावत आहेत. तेव्हा प्रत्येकाने याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. डेंग्युबरोबरच चिकुनगुनियाचेदेखील रुग्ण वाढत आहेत. एडीस डासांच्या चावण्यामुळे चिकुनगुनिया हा आजार होतो. तेव्हा डासांपासून संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

चिकुनगुनिया हा तापाचा आजार आहे. साधारण तीन-चार दिवस ताप राहतो. थंडी वाजून ताप येतो. चिकुनगुनियाची ही लक्षणे जवळपास डेंग्युसारखीच आहेत. त्यामुळे दोन्हीही आजारांची चाचणी करण्यासाठी रक्त तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

चिकुनगुनियामुळे अंग दुखणे, सांध्यांवर सुज येणे अशी लक्षणे अधिक असतात. चिकुनगुनिया हा आजार अधिक धोकादायक नसला तरी यामुळे शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. तेव्हा दोन्ही संसर्गजन्य आजारांबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!