अखिल भारतीय समता परिषद महिला आघाडी तालुका व शहर संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप व कार्यकारिणी निवड सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक अंजली श्रीवास्तव होत्या. महिलांनी माता सावित्रीचा आदर्श घेऊन सक्षमपणे उभे राहिले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय समता परिषद यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक गणेश करे पाटील होते. माँ जिजाऊ यांचे संस्कार व महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य यावर युवकांनी प्रेरित होणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण कसं जगलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. आरोग्य सल्लागार म्हणून डॉ. कविता कांबळे यांनी महिलांच्या आरोग्याच्या समस्या याचे कसे निराकरण करायचे याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ.सोमनाथ बोराटे यांनी शासकीय व संस्थेमार्फत महिलांना वेगवेगळ्या योजना कशाप्रकारे मिळतात हे मार्गदर्शन केले. श्री.जगन्नाथ जाधव यांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सोप्या भाषेत समजून सांगितला. स्वाती माने यांनी त्यांच्या कवितेतून व विचारातून महिलांना बळ देण्याचे काम केले. मोफत शिवण क्लास मध्ये भाग घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच तालुका व शहर कार्यकारिणी मधील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवनाथ मोहोळकर, मधुकर शिंदे, सुरेखा जाधव व रेणुका मोहोळकर इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता राऊत यांनी केले. प्रस्ताविक अश्विनी जाधव-माने यांनी केले. आभार प्रदर्शन शितल शिंदे यांनी केले.समता परिषदेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला.