अमळनेरच्या अंबरीशी महाराज टेकडीला आग – ३०,००० हून अधिक झाडे भस्मसात!
अमळनेर : विक्की जाधव..
तालुक्यातील अंबरीशी महाराज टेकडीवर भीषण आग लागली होती. या आगीत सुमारे ३०,००० ते ३५,००० झाडे जळून खाक झाली. समाजसेवक आणि टेकडी ग्रुपच्या अथक श्रमदानाने वाढवलेल्या या हरित क्षेत्राला समाजकंटकांच्या व्यसनाधीन वागणुकीचा मोठा फटका बसला आहे.
व्यसनाधीन समाजकंटक टेकडीच्या विध्वंसाला जबाबदार?
ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी आरोप केला आहे की, टेकडी परिसरात नियमितपणे काही व्यसनाधीन लोक दारू, गांजा आणि भांग सेवनासाठी जमतात. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचा लढा व्यर्थ?
टेकडी ग्रुप आणि अमळनेर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे झाडे लावून, पाणी पुरवून आणि संवर्धनाचे काम करून ही टेकडी हिरवीगार केली होती. मात्र, एका रात्रीत या आगीत संपूर्ण परिसर उजाड झाला आहे.
प्रशासनाने ठोस कारवाई करावी!
स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाला तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. टेकडीवर सुरक्षारक्षक तैनात करणे, सीसीटीव्ही बसवणे आणि व्यसनाधीन समाजकंटकांवर कठोर कारवाई करणे ही तातडीची गरज आहे.
ही आग फक्त झाडांची नव्हे, तर निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मेहनतीची राख आहे. प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू शकतात.