June 28, 2025 5:06 pm

मुलींनो घाबरू नका कर्मयोगी आहे तुमच्या पाठीशी…

अपनी भाषा में पढ़े! Translate

मुलींनो घाबरू नका कर्मयोगी आहे तुमच्या पाठीशी…

कर्मयोगी गरीबांच्या मुलीच्या लग्नाला प्रत्येकी ११ हजार रुपये मदत करणार..
कर्मयोगी फाऊंडेशन हे ग्रामीण भागात जवळपास २१७ गावात सातत्याने आपल्या “बोलते नव्हे तर कर्ते व्हा” या तत्वानुसार गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांच्या विचारांची शिदोरी सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात दुःखीकष्टी गोरगरीब लोकांच्या घरी मदतीचा व प्रेमाचा दीप लावत आहे.
२०२४ मध्ये कर्मयोगीने चला गाडगे बाबांचे विचार जपुया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम हाती घेत आईवडिलांचे छत्र हरवलेल्या १९ मुलींना साडीचोळी व १० हजार रुपये देवून गरिबांच्या मुलींच्या लग्नाला मदत करा हा गाडगेबाबा यांचा संदेश कृतीत उतरवित दुःखीकष्टी मुलींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
हाच उपक्रम २०२५ मध्ये राबविण्याचा निर्णय घेत कर्मयोगी फाउंडेशनने त्याला व्यापक रूप देत अल्पभूधरक शेतकरी, शेतमजूर, कामगार व आईवडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीच्या लग्नाला प्रत्येकी ११ हजार व साडीचोळी देवून मानवता जपण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमाविषयी सांगताना कर्मयोगीचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे सांगतात की २०२४ मध्ये हा उपक्रम राबविताना आम्हाला अतिशय हालाकीच्या परिस्थितीचे दर्शन झाले. बऱ्याच मुलींना वडील नाहीत, करणार कोणी नाही, आर्थिक परिस्थिती अतिशय कमजोर त्यामुळे मुलींच्या आईने आपल्या मुलीचे लग्न मुलांकडे जावून लावून दिले.गेल्यावर्षी हा उपक्रम आम्ही आईवडील नसलेल्या मुलांसाठीच राबविला परंतु यावर्षी शेतमालाला मिळत असलेला कमी भाव व त्यातही कमी उत्पन्न त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेला आहे त्यामुळे त्याच्या अंगावरचे कपडे सुध्दा वर्ष वर्ष बदलून राहिले नाही आहेत. अशा परिसथितीत हा जगाला पोसणारा बळीराजा आपल्या मुलींचे लग्न कसे करणार या सर्व परिस्थितीचे गांभीर्य जाणत व सोबतच हातावर आणून पानावर खाणारा शेतमजूर, कंत्राटी कामगार यांच्या मुलींचे लग्न सुद्धा आनंदाच्या व प्रेमाच्या वातावरणात व्हावे म्हणून कर्मयोगीने ग्रामीण भागातील मुलींच्या लग्नाला ११ हजार रुपये व साडीचोळी देवून मदत करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पाची सुरुवात ९ फेब्रुवारी २०२५ ला बुटीबोरी येथे आईवडील नसलेल्या व गरजवंत १०१ मुलांना सायकल देवून त्यांचा शिक्षणातील उत्साह वाढविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात एका लग्न जुळलेल्या गरीब मुलीला मदत करून करण्यात येणार आहे. हा उपक्रम ९ फेब्रुवारी २०२५ पासून ३१ जुलै २०२५ पर्यंत राबविण्यात यईल. ग्रामीण भागातील जास्तीजास्त गोरगरीब मुलींच्या लग्नाला मदत करता यावी यासाठी या दुःखीकष्टी मुलींना आपली बहीण, मुलगी मानून दानशूर व्यक्तिमत्वांनी कर्मयोगीला मदत करण्यासाठी व ज्यांना मुलींच्या लग्नाला मदतीची गरज आहे त्यांनी कर्मयोगी फाउंडेशनचे सरचिटणीस शिवाजी बारेवार ९०११७७९००९ यांच्याशी संपर्क करावा असे पंकज ठाकरे यांनी आव्हान केले आहे..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!