आज जिल्हा नियोजन समितीची बैठक जालना येथे संपन्न….
संजीव पाटील.।।
जालना:-आज जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे पालकमंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या छोट्या गटाची स्थापना करण्याची मागणी केली आ.संतोष भाऊ दानवे यांनी केली.त्यासोबत भोकरदन-जाफ्राबाद मतदार संघात शाळा खोल्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली असून त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.अशी मागणी ही दानवे यांनी केली. धरणामध्ये साठलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, अनाधिकृत शस्त्र परवाना धारकांना आळा घालण्याची मागणी यावेळी दानवे यांनी केली.व शासकीय अधिकाऱ्यांनी मतदार संघात सह जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाने वागणूक देऊन बोलावे व त्यांची कामे तातडीने मार्गी लावावी असे विविध मुद्दे आ.संतोष दानवे यांनी उपस्थित केले.
याप्रसंगी मा.आमदार संतोष भाऊ दानवे,मा.आमदार बबनराव लोणीकर,मा.आमदार अर्जुन खोतकर,मा.आमदार हिकमतदादा उढान,जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळजालना, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिना मकवाना, तसेच जालना पोलीस अधीक्षक श्री बन्सल यांच्यासह इतर विभागाचे प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.