सक्सेस अकॅडमी क्लासेसमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.
अमळनेर : विक्की जाधव.
सक्सेस अकॅडमी क्लासेसमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष निरोप समारंभ आयोजित केला गेला. 19 जानेवारी 2025 रोजी, लोकमान्य टिळक जुना टाऊन हॉल, अमळनेर येथे हा समारंभ संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनीं, व मित्रमंडळींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आपल्या आवडत्या कला प्रदर्शनात भाग घेतला.समारंभात, नृत्य कार्यक्रम, डान्स कॉम्पिटिशन आणि विविध सांस्कृतिक क्रियाकलाप आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व मेडलसह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये मा. न्यायाधीश श्री गुलाबरावजी पाटील, अमळनेर तालुक्यातील प्रसिद्ध मुंदडा बिल्डर्सचे ओमप्रकाश मुंदडा, स्वामी विवेकानंद हायस्कूलचे चेअरमन श्री विवेकानंदजी भांडारकर, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटील, भारत जागृत मंचाचे अध्यक्ष श्री नाना अभिमन पाटील, श्री धनगर सर, यश पंढरी क्लासेसचे संचालक प्रकाश पाटील सर, श्री गौरव धनगर सर यांचा समावेश होता.मुख्य वक्त्यांमधून श्री अमोल पाटील यांनी आणि भूषण वाणी सरांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देत विचारले की, “आपण आपल्या बुद्धीच्या बलावर योग्य त्या परीक्षांना सामोरे जावे.” यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने यशाच्या मार्गावर चालत राहण्याबाबत मार्गदर्शन केले.”सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आपण आपल्या लक्ष्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो. आई-वडिलांच्या कष्टांचा आदर ठेवताना, त्यांच्यासोबत निष्ठेने वागून, समाजात आपले स्थान निर्माण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन श्री न्यायाधीश, ओमप्रकाश मुंदडा, आणि विवेक जी भांडारकर यांनी केले.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पवन पाटील सरांचे नेतृत्व गौरवयुग ठरले. त्यांनी सूत्रसंचालन करताना सर्व उपस्थितांचे स्वागत करून जाहीर आभार मानले. या समारंभामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली आणि त्यांचे कार्य संस्कृतीला एक नवा उफराट देणारे ठरले.