माजी मंत्री अनिल पाटलांचा एकच ध्यास महत्वाची पदे घरातच ठेवून साध्यं होणार का तालुक्याचा शस्वात विकास..
विक्की जाधव मार्मिक समाचार.
मंत्री अनिल पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री ताई अनिल पाटील यांनी सर्वच ठिकाणी मी लाभार्थी म्हणून महत्वाची पदे आपलीकडे घेतली तर आम्ही तुपाशी आणि तालुका उपाशी अशी गत सद्या अमळनेर तालुक्याचीं झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा एकच वेळी कोणतेही कारण न देता नाकारण्यात आलेला पिक विमा संदर्भात तालुक्यातील शेतकरी संताप्त भावना व्यक्त करत असून मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन आपणाकडे खाते असून देखील आपण कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत केली नाही.
शेजारील तालुका दुष्काळग्रस्त जाहीर होऊन आपला तालुका दुष्काळग्रस्त का जाहीर झाला नाही असे शेतकऱ्याने प्रश्न विचारले. तर माजी आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी पाच वर्षांमध्ये एकही आमसभा का घेतली नाही असाही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलाय.
मागील काळात एकीकडे आपण पक्षाचे लाभार्थी होत आहेत तर दुसरीकडे आपले असंख्य राष्ट्रवादी अजित पवार गट कार्यकर्त्यांनी आपल्यावर नाराजी व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती जनतेस पडलेले हें कोडे सोडवण्यास आपण आकार्यक्षम ठरले आहात आता जनतेची दिशाभूल करूण आपणास सहानुभूती मिळणार नाही. जनतेने आपणास पद्धतशीर नाकारले आहे.
असे शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराचे गुलाब पाटील यांनी मार्मिक शी बोलतांना आपले मत व्येक्त केले.
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे तस तसे राजकीय घडामोडीत नवनवीन ट्विस्ट तालुक्यातील जनतेस बघावयास मिळत आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालीनां वेग आला आहे.
विशेषतः माजी मंत्री अनिल पाटील यांच्या राजकारणावर आणि तालुक्यातील एकांदरीत परिस्थिती पाहता त्यांच्या पराभवासाठी मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांचे अमळनेर विधानसभा क्षेत्रावर बारीक लक्ष लागून आहे. मागील काळात शरद पवार यांनी असे म्हटले होते की येणाऱ्या विधानसभेत अनिल पाटील दिसणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ तरी आमच्या सूत्रांच्या माहिती नुसार येत्या पुढील काही दिवसात अमळनेर विधानसभा क्षेत्रात शरद पवार, राहुल गांधी,आणि प्रियंका गांधी. यांचे दौरे लागणार असून माजी आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा पराभव करण्यासाठी डावपेच आखले जात आहेत.
क्रमशः