धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती असून सामान्य शेतकऱ्यांचा स्वाभिमान गहाळ नाही. म्हणूनच ही निवडणूक लढवीत आहे.
जनसमुदायासमोर बोलताना रवींद्र बापू चौधरी यांचे अश्रू अनावर..
अमळनेर :विक्की जाधव.
विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा हिरालाल चौधरी यांनी काल २८ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
संपूर्ण अमळनेर – पारोळा तालुक्यातील मतदार मोठ्या जनसंख्येने उपस्थित होते.
मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहात जनसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील अबाल वृद्ध, महिला, तरुण, आणि विविध समाज बांधव यांचे रवींद्र बापू चौधरी यांनी आभार व्यक्त केले आणि आपल्या शिरीष दादाला मोठ्या संख्येने विजय करून आणा असे आव्हानही त्यांनी केले.
मंत्री अनिल पाटील यांच्यावर बोलताना हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र चौधरी म्हटले. मतदार राजा हा राजाचं आहे. पाच वर्षासाठी आपण ज्यांना सत्ता दिली. ज्यांना या मतदारसंघाने निवडून आणले, त्यानेच या बळीराजाचा माझ्या शेतकरी कष्टकरी बांधवाचा जीव घेतला. मंत्री अनिल पाटील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांना झाले नाहीत. मंत्री अनिल पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव दादा यांना झाले नाहीत. एवढेच काय शरद पवार साहेब यांनाही झाले नाहीत. ते मतदार संघाला काय होणार.
भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणून तालुक्यातील जनतेला वेळेत काढायचे आता हे चालणार नाही. पिक विमा संदर्भात पीक विमा कंपनी सोबत सेटलमेंट करून 30 टक्के कमिशन खाणार्या माजी मंत्र्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आपल्या शिरीष दादाला मतदान रुपी आशीर्वाद द्या.. असे ते म्हटले
यावेळी माजी मंत्री अनिल पाटील यांच्यावर असणारा प्रचंड रोष शेतकऱ्या दिसून आला. कोणत्याही परिस्थितीत अमळनेर तालुक्याचे सत्ता बदल होणार आणि होणारच असे शेतकऱ्यांच्या रोषा मधून दिसून येत होते. हजारोच्या जनसंख्येने जमलेल्या मतदारांसोबत संवाद करताना रवींद्र बापू चौधरी यांच्या डोळ्यातून यावेळी भावनिक अश्रू अनावर झाले. यावेळी ते म्हटले की आमच्या परिवारावर आजही एवढ्या मोठ्या संख्येने प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली नाही. या जनते च्या प्रेमापोटीच आम्ही ही निवडणूक लढवीत असून आम्ही पैसा कमवायला आलेलो नाहीत. असेही ते म्हटले. दुष्काळग्रस्त असलेल्या आपल्या अमळनेर तालुका विकासाच्या दृष्टीने किती मागे राहिला या संदर्भात त्यांनी संबोधन केले. हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायासमोर बोलताना यावेळी जाणीवपूर्वक ते म्हणाले की धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती आणि सामान्य शेतकऱ्यांचा स्वाभिमान जर कोणी विकत घेत असेल तर त्याची लायकी काढा त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आपल्या शिरीष दादाला मोठ्या संख्येने विजय करून आणा असे आव्हानही त्यांनी केले.