June 30, 2025 9:27 pm

हजारोच्या मतदारांचा साक्षीने माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भरले आपले नामांकन पत्र..

अपनी भाषा में पढ़े! Translate

हजारोच्या मतदारांचा साक्षीने माजी आमदार शिरीष चौधरी यांनी भरले आपले नामांकन पत्र..

 

 

अमळनेर :विक्की जाधव.

विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा हिरालाल चौधरी यांनी काल २८ रोजी हजारोच्या जनसंख्येने उपस्थित मतदारांच्या समवेत अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल.

शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराने विधानसभेचा नामांकन भरण्यासाठी तालुक्यातील जनतेला केले होते आव्हान याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहात केले रेकॉर्ड ब्रेक गर्दी यावेळी जनसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील अबाल वृद्ध, महिला, तरुण, आणि विविध समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी १० वाजता संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथून भव्य रॅलीला सुरुवात झाली तत्पूर्वी माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे मोठे बंधू रवींद्र बापू चौधरी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन पुष्पहार अर्पण करून पुढे साने गुरुजी पुतळा येथे देखील पुष्पहार अर्पण करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंगळ ग्रह देवस्थान येथे दर्शन करून वाडी चौक येथून मा. आ. शिरीष चौधरी यांचे नामांकन भरण्यासाठी भव्य अशी रॅली चे करण्यात आले होते आयोजन संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे पांडुरंगाचे दर्शन घेऊन वाडी चौक, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, संत गाडगेबाबा चौक, बस स्टॅन्ड, महाराणा प्रताप चौक. प्रांताधिकारी कार्यालय परिसरात हजारोच्या जनसंख्येने उपस्थित असणाऱ्या मतदार राजाला डॉक्टर रवींद्र बापू चौधरी माजी आमदार शिरीष दादा चौधरी आणि गुलाबराव पाटील यांनी केले संबोधन. यावेळी मतदारांमधून मंत्री अनिल पाटील यांच्यावर असणारा रोष दिसून आल, कोणत्याही परिस्थितीत अमळनेर तालुक्याचे सत्ता बदल होणार आणि होणारच अश्या घोषणा देण्यात आल्या.

मतदारांसोबत संवाद करताना रवींद्र बापू चौधरी यांच्या डोळ्यातून आले अश्रू

यावेळी बोलताना रवींद्र बापू चौधरी यांनी माजी आमदार मंत्री अनिल पाटील यांच्यावर बोलतांना जोरदार फटके लगावले शेतकरी आत्महत्या, पिक विमा, दुष्काळग्रस्त अमळनेर तालुका विकासाच्या दृष्टीने किती मागे राहिला या संदर्भात त्यांनी संबोधन केले. पिक विमा कंपनीकडून माजी मंत्री अनिल पाटील यांनी घेतलेले कमिशन संदर्भात देखील ते बोललेत. हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायासमोर बोलताना रवींद्र बापू चौधरी यांच्या डोळ्यातून भावनिक अश्रू आलेत. यावेळी जाणीवपूर्वक ते म्हणाले की धनशक्ती विरुद्ध ही जनशक्ती आणि सामान्य शेतकऱ्यांचा स्वाभिमान जर कोणी विकत घेत असेल तर त्याची लायकी काढा. पाच वर्ष तालुक्याकडे ढुंकूनही न बघणाऱ्या या मंत्र्याला त्याची जागा दाखवण्यासाठी हीच वेळ आहे असे ते म्हटले.

माजी आमदार शिरीष दादा चौधरी बोलताना म्हणाले की विकासाच्या दृष्टिकोनाने अमळनेर तालुका किती मागे आहे हे समस्त जनात सांगणे उचित ठरणार नाही. अमळनेर तालुक्याचा विकास करायचा असेल तर सत्ता बदल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराचे गुलाब पाटील बोलताना म्हणाले की घाबरू नका घाबरायचं काही कारण नाही. शिरीष दादा चौधरी यांच्या लग्नाचा मुहूर्त पक्का झाला असून, साखरपुड्याला एवढी गर्दी झाली आहे की समोरच्यांची धडकी भरेल. यावेळी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांची समक्ष मा. आ. शिरीष चौधरी त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराच्या प्रेमापोटी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, कष्टकरी, शिक्षक, व्यापारी, नोकरदार, आणि समस्त बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवलीं

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!