शेतकऱ्यांचा कर्दनकाळ असलेले मा.मंत्री अनिल पाटील यांना आता जनता जनार्दन च जागा दाखविणार अमळगाव येथील प्रचार मेळाव्यात अमळगाव येथील प्रचार मेळाव्यात शिरीष चौधरी यांचा घाणाघात..
अमळनेर : विक्की जाधव
तालुक्यातील सुमारे १३५ शेतकरी १ कोटी ३५ लाख रुपयांच्या ठिबक अनुदानापासून वंचित राहिल्याने तसेच सुमारे सहा हजार शेतकऱ्यांचा पीक विमा रिजेक्ट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणे याला सर्वस्वी जबाबदार मंत्री अनिल पाटील आहेत, असा घाणाघात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अमळगाव येथील प्रचार मेळाव्यात केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी प्रचार मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी हिरा उद्योग समुहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी, माजी नगरसेवक गुलाब पाटील, पंच क्रोशीतील सरपंच, उपसरपंच, वि.का. सोसायटी चेअर मन, ग्रामपंचायत सदस्य असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे शिरीष चौधरी म्हणाले की, अनिल पाटील हे स्वत: मदत व पुनर्वसन मंत्री असूनही स्वत:चा तालुका हा दुष्काळ घोषित होण्यापासून वंचित राहतो, ही एकप्रकारे मंत्र्याची नामुष्की आहे. पाटील निस्क्रिय मंत्री असून त्यांनी शेतकऱ्यांना डोळ्यात अश्रू आणलेत.
अनिल पाटील निवडून येण्यासाठी जनतेने स्वत:च्या घामाचा पैसा झोळीत टाकला होता. त्याचा मंत्री पाटील यांनी हा मोबदला दिला का? असाही संताप मा. आ. शिरीष चौधरींनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. रवींद्र पाटील यांनीही अमळनेर मतदारसंघावर अन्याय झाल्याने मंत्री अनिल पाटलांवर आगपछाड केली. ते म्हणाले की, विकासाच्या नावाखाली कमिशन घेणे हेच कामे अनिल पाटलांनी केले. गावागावात निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळेच अमळगाव येथील दलित वस्तीचे प्रवेशद्वार कोसळले.
गुलाब पाटील म्हणाले की, गोरगरीब जनतेचा नेता शिरीष चौधरीच आहेत,शिरीष चौधरी यांच्या कडे नेहमी शेतकरी, जनतेला मानसन्मान दिला जातो. कुणाचाही अपमान केला जात नाही. मंत्र्यांच्या दारावर निवेदन मागण्यासाठी जे जे लोक गेले आहेत, त्यांचा अपमान करण्यात आला आहे. म्हणून हा डमी भूमिपुत्र यांना बाहेरचा रस्ता दाखवा असेही ते म्हणाले. लोकांभिमुख नेतृत्व फकत शिरीष दादा च असून तेच गोरगरीब जनतेचे नेते आहेत.
यावेळी अमळगाव व पंचक्रोशीतील नागरिक हजारो चा संख्येने उपस्थित होते.