नाकारलेल्या पीक विम्याबाबत शेतकऱ्यांनी दिले निवेदन शेतकऱ्यांबद्दल थोडीही तळमळ नसणारे सरकर अन् सत्तेत असणारे लोकप्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या आपत्तीचे व्यवस्थापन होणार का ?? असे जनसामान्यातून बोलले जात आहे.
अमळनेर : विक्की जाधव.
ऑनलाइन पिकविमा अर्जात कोणतीही चूक नसताना ओरियनंटल विमा कंपनीने अमळनेर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा अर्ज नाकारल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागांकडे निवेदनदेत तक्रार केली असून पिकविमा अर्ज नाकारण्यात आल्याचा संदेश सामान्य काळया आईची सेवा करणार्या शेतकऱ्यांना मोबाईल वर मेसेज देऊन कंपनीने हात झटकले आहेत तर
टक्केवारीत शेतकऱ्यांनाही हवालदिल केले असून
पिक विमा कंपनीकडून माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी ३० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रवींद्र बापू चौधरी यांनी केला आहे.
पिकविमा नाकारण्यात आलेले शेतकऱ्यानी मोबाईलवर आलेल्या मेसेजची पडताळणी करण्यासाठी ऑनलाइन चौकशीसाठी गेले असता त्यांच्या अर्जात कोणतीही चूक नसतांना व कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण न देता अर्ज नाकारण्यात आले असल्याचे सांगितले.
कंपनीने सदर प्रस्तावाचे कोणतीही अधिकृत अशी माहिती न देता शेतकऱ्याची दिशभुल केल्यामुळे ओल्या दुष्काळ सदृश परिस्थितीत अमळनेर तालुक्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. येत्या विधानसभेत शेतकरी आपला रोष व्यक्त करून अमळनेर तालुक्याचे पुनर्वसन करतील असे ही त्यांनी सांगितले.