अमळनेर ही संतांची आणि साने गुरुजीं चीं भूमी यां तुळशीवृंदावनात ही भांगेची रोपटे कुठून आली. संजय राऊत यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर केला घाणघात..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर ही संतांची आणि साने गुरुजीं चीं भूमी यां तुळशीवृंदावनात ही भांगेची रोपटे कुठून आली. संजय राऊत यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर केला घाणघात..
अमळनेर शहरात मराठा मंगल कार्यलय येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजय राऊत यांनी मंत्री. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर त्याचाच होमग्राउंड वर चांगलाच घाणघात केला. या वेळी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करत होतें. यां संदर्भात सविस्तर वृत्त असें कीं..
१५०० रुपये जामा करू सुद्धा ह्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात येथे आल्या आहेत. त्यांना पंधराशे नाकी सुरक्षा दया, येत्या विधानसभेत पंधराशे रुपयाचा जुमला चालणार नाही. अमळनेरकरांचे शिवसेनेवर असलेले प्रेम बघून माला येथे येऊन असे वाटले कीं मीच यां विधानसभा क्षेत्रतून निवडणूक लढवावी. असे खासदार पत्रकार संजय राऊत यांनी म्हटले. अँड ललिता पाटील यांनी अमळनेर ची जागा शिवसेनेला सुटावी असा आग्रह धरल्यावर ह्या मतदार संघात जो गद्दारांचा पराभव करेल तोच ईथला उमेदवार. असेल असेही संजय राऊत यांनी सांगितले.
अमळनेर काय आहे हें सर्वाना ठेऊकं आहे.
मंत्री अनिल पाटीलावर बोलतांना तें म्हटले कीं अमळनेर ही संतांची आणि साने गुरुजीं चीं भूमी आहे. तुळशी वृंदावनात ही भांगेची रोपटे कुठून आली. असाही प्रश्न त्यांनी जनता आणि कार्यकर्ते यांना केला. यावेळी बोलतांना तें म्हटले कीं पवार साहेबांना दिल्ली वरून सेक्युरेंटी येते म्हणजेच गृहमंत्री निःस्कृष्ट दर्जाचा आहे काय?? पोलीस खाते हें निःस्कृष्ठ आहे असा प्रश्न पडतो. तर महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसात ११ मुलीन वर बलात्कार झाले. याचं मुख करण असे आहे कीं यां राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. जे सरकार भ्रष्टाचारांने सत्तेवर आले त्यांना कायद्याचे धाक काय राहणार??
सरकार वर बोलतांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपला मोर्चा वळवला..
पक्ष स्थापन झाल तेव्हा एकनाथ शिंदे ४ वर्षाचा होता. असाही घणाघात त्यांनी केला. पुढे मोदी सरकार वर बोलतांना तें म्हटले कीं ४०० पार झाले असते तर त्यांनी राज्यघटना संपवली असती पण त्यांना ब्रेक लावायचे काम ह्या महाराष्ट्र ने केले आहे. हा महाराष्ट्र आहे. ऐक तर महाराष्ट्र पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. तुमच्या कडे ED आहे यंत्रणा आहे करा चौकशी. आम्ही तयार आहोत. असे ही तें म्हटले. तर पुढे यां राज्य वर संकट आहे आणि हें संकट भांडवलदारांचे आहे. यां महाराष्ट्रतं कोणीही यावं आणि महाराष्ट्र लुटून न्यावा.. ही काय जाहगिरी नाही पुढे. तें नरेंद्र मोदी आणि अमित शहा हें देश भक्त नाही तर हें देशद्रोही लुटेरे आहेतं. असे ही तें म्हटले यां देशात कोण सुखी आहे तर कोणीही नाही. ना शेतकरी सुखी आहे, ना विद्यार्थी सुखी आहे. पुढे बोलतांना तें म्हटले कीं महिलांचा तर प्रश्नच नाही रोज महिलांना वर होणारे अत्याचार सबंध महाराष्ट्र बघतोय येणाऱ्या विधानसभेत जसा लोकसभेला यांचा पराभव केला तशाच पद्धतीने विधानसभेतही करू असा विश्वास त्यांनी शिवसेनेच्यां पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला. अनिल पाटील यांच्यावर बोलतांना तें म्हटले कीं हा तुमचा मंत्री पवार साहेबाच्यां मागे पुढे फिरणार त्यांच्या जवळ लोटांगण घालणारा, ह्या मंत्र्याला येत्या विधानसभेत म्हणजेच पवारसाहेब म्हटले होतें कीं पुढील विधानसभेत अनिल पाटील दिसणार नाहीत यासाठी आम्हीही प्रयत्न करू.असा विश्वास त्यांनी शिवसेनेच्यां पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.