अपुर्ण अवस्थेत असलेल्या बुदध विहाराचे बांधकाम तात्काळ सुरू करावे व समिती स्थापन करण्याची मागणी – यु.पी. आर.पी, बौद्ध संघटना.
प्रतिनिधी -विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – सन २०१६ पासून ते आजपर्यंत दौड नगरपरिषदेमार्फत बुद्ध विहार बांधण्याचे काम सुरू असून मागील ०८ वर्षांपासून फक्त पाया भरणीचे काम सुरु असुन ते सुद्धा अपुर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहे. सदरचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी अर्थिक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. दि. २४ ऑगस्ट २०१६ रोजीच्या शासनाच्या प्रपत्राद्वारे वैशिष्ठयपूर्ण योजनेअंतर्गत ०३ कोटींचा निधी अंशाच प्रकारे वेगवेगळया स्वरूपात अर्थिक निधी दौड नगरपालिकेकडे वर्ग झाला असताना बुद्ध विहाराचे बांधकाम मात्र पाया भरणीच्या वरती येताना दिसत नाही. मागील काही महिन्यात तेथील कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे लोखंडी गज काही चोरट्याने चोरून नेल्याचे समजते. यावरून दौड नगरपरिषद या घटनेकडे जाणीवपुर्वक व जातीय द्वेषभावनेतून दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या सर्व घटनांचा संघटनेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत असून या निवदेनाद्वारे मागणी करीत आहोत की, सदरचे रखडलेले बुद्धविहाराचे बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे. व काम सुरू असताना काही गैर प्रकार घडू नये व बुद्धविहाराचे धार्मिक पावित्र्य कायम राहण्यासाठी दौंड शहरातील काही प्रमुख महत्वाचे लोकांची समिती गठीत करण्यात यावी व त्या समितीच्या मार्गदर्शनाखालील बुद्ध विहाराची वास्तू उभी करावी अशी मागणी करण्यात आली.
जर बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही तर कायद्याच्या सनदशीर मागनि तीव्र स्वरूपाचे आंदोलन दौड नगरपरिषदेसमोर छेडण्यात येईल. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास दौड न.प.चे मुख्याधिकारी हेच जचाबदार राहील अशा प्रकाराचे निवेदन दौंड नगरपरिषदेला देण्यात आले.
यावेळी प्रमोद राणेरजपूत,
सागर उबाळे ,अमर गायकवाड, निखिल भोकरे, अमित सोनवणे ,हिरण खुड़े , विकी शेलार व अनेक सामाजिक संघटना व पदाधिकारी उपस्थित होते.