बालदिंडीतून सामाजिक व सांस्कृतिक परंपरेची शिकवण ..
प्रतिनिधी / विकी ओहोळ
8446119158
दौंड – “मोगरा फुलला मोगरा फुलला ।।फुले वेचिता बहरू कळियासी आला।।”
दौंड तालुक्यातील द सायन्शिआ स्कूल जिरेगांव या शाळेने शुक्रवार दिनांक १२ रोजी स. ०९ :०० वा. बाल चिमुकल्यांनी आषाढी वारी निमित्त आषाढी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते .कुरकुंभ भाजी मंडई ते फिरंगाई माता मंदिर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात लहान चिमुकल्यांनी वाजत गाजत दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पंक्तीनुसार मुलांच्या आनंदाचा मोगरा टाळ मृदूंगाच्या आवाजाने आषाढी वारीनिमित्त फुलला आहे. यानुसार महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याच संतपरंपरेचा वारसा आजच्या पिढीला पुढे नेण्याकरिता त्याचबरोबर संतांच्या विचाराची व परंपरेची शिकवण आजच्या पिढीला मिळावी या उद्देशाने जिरेगांव येथील सुनिता फाउंडेशन संचालित शकुंतला सातपुते स्मरणार्थ द सायन्शिआ स्कूल मध्ये आषाढी बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. हि दिंडी भाजी मंडई ते फिरंगाईमाता मंदिरापर्यंत काढण्यात आली. या दिंडीत चिमुकल्यांनी वारकरी पोशाखामध्ये भजन,कीर्तन व हरिनामाचा जय जयकार केला. त्याचबरोबर या दिंडीतून एकता ,समानता, बंधुता व पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यात आली. यामध्ये मुलांनी संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव,संत तुकाराम, संत सावतामाळी, संत एकनाथ या संताच्या भूमिकांचे सादरीकरण केले. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशामध्ये चिमुकले तयार झाले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ सातपुते,सचिव श्वेता मोरे, आश्रुबा सातपुते,अमोल मोरे तसेच शाळेतील शिक्षक वैशाली शितोळे,रुपाली शेजाळ, संतोषी साळुंके, अश्विनी गिरमे ,अश्विनी खंडाळे, कामेश्वरी ठाकरे तसेच त्याप्रमाणे कर्मचारी राणी सोनवणे, पुष्पा माने ,संतोष गायकवाड, श्रीकांत थोरात या सर्वांनी दिंडीचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडले. या बालदिंडीमध्ये सर्व विद्यार्थी,पालक तसेच ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.