जय गोपाला सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार व दहावी आणि बारावीत विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.
अमळनेर : विक्की जाधव
छत्रपती संभाजी नगर येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे, समाज सेवेला पुर्णपणे वाहुन घेणारे,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समाज बांधवांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार,आदर्श माता पुरस्कार तसेच10 वी 12 वी च्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न झाला
यावेळी प्रमुख पाहुणे मा.एकनाथराव बोरसे सर वरिष्ठ उपाध्यक्ष अखिल भारतीय धोबी महासंघ दिल्ली,मा.किसनराव जोर्वेकर माजी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ,मा.राजाभाऊ उंबरकर माजी प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ,मा.अनिलजी शिंदे कार्यअध्यक्ष नॅशनल धोबी महासंघ दिल्ली,मा.सौ.किर्तीताई शिंदे नगरसेवका छत्रपती संभाजी नगर,मा.अरुण धोबी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ,मा.अशोक दामले शहर अध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ संभाजीनगर मा.प्रा.डॉ.पढरीनाथ रोकडे अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय ओबीसी प्राध्यापक संघटना महाराष्ट्र प्रदेश आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना प्रा डॉ पंढरीनाथ रोकडे यांनी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावताआपले करिअर करण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या जीवनातील विविध संधींची ओळख करून दिली तर मा.अनिलजी शिंदे यांनी येणाऱ्या काळात परीट समाजातील समाज बांधवांसाठी आरक्षणाची आवश्यकता विशद करून आरक्षणाविषयी ची माहिती उपस्थिती त्यांना दिली मा. किसनराव जोर्वेकर यांनी विद्यार्थी व पालकांनी पारंपरिक व्यवसाय सोडून आधुनिक व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित करावे या अनुषंगाने मार्गदर्शन केले मा. कीर्ती ताई शिंदे यांनी समाजातील महिला वर्गांनी शिक्षणासोबतच आपल्या आपल्या परिवाराचा विकास बाबत मार्गदर्शन केले अध्यक्ष समारोप करताना मा.एकनाथराव बोरसे यांनी आपला समाज एक संघ कसा राहील आणि समाजाचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता प्रतिपादन केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नारायण जाजेवार सर सौ.दिपाली ठोंबरे मॅडम यांनी केले.कार्यकमाचे संयोजन गणेश भिकनराव मढीकर नियोजन समिती आबाराव सिरसाठ, ज्ञानेश्वर राऊत, मारुती जाधव,अशोक बर्वे,बाळु दळवी, कल्याण मढीकर,गणेश तांदळे, मयुर मोतिवाले,शुभम वाघ,गजानन पैठणकर रविंद्र ठोंबरे,गणेश ठोंबरे,अशोक शिंदे, रविंद्र म्हस्के, अविनाश म्हस्के, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविरत परिश्रम घेतले.