संत श्री. सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर यांचा वार्षिक यात्रा उत्सव आजपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
अमळनेर: विक्की जाधव.
२५० वर्षाची परंपरा असलेल्या या उत्सवाची जय्यत तयारी वाडी संस्थान तर्फे करण्यात आली आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज संस्थांनचे गादीपुरुष परमपूज्य संत श्री प्रसाद महाराज यांचे उपस्थितीत स्तंभारोपण व ध्वजारोहन होऊन यात्रोत्सवाचा शुभारंभ झाला. नदीपात्रात सकाळी ९ वाजता लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला असून १० मे ते १७ मे दररोज सकाळी ९ ते १२ पर्यंत श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन होणार असून १८ मे मोहन महाराज बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे आगमन होऊन गाथा भजन ची सांगता होणार आहे. दि १९ वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीला सायंकाळी रथोत्सव तर दि २३ रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेला सकाळी ६ पासून पालखी मिरवणूक काढण्यात येणार येते दि २४ रोजी मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार असे संस्थेचे रवींद्र देशमुख दिलीप देशमुख यांनी मार्मिक शी बोलताना सांगितले.