अमळनेर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारपडली “निर्भय बनो” अभियानाची भव्य जाहीर सभा..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर येथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या “निर्भय बनो” अभियानाच्या भव्य जाहीर सभा नुकतीच साने गुरुजी विद्यालयाच्या ग्राउंड वर पार पडली डॉ.विश्वंभर चौधरी यांनी सांगितले की, लोकशाही कुण्या एका व्यक्तीवर चालत नाही.
एकच व्यक्ती देश चालवतो आहे असे कुणी घमंडी व्यक्ती मानत असेल तर तो १४० कोटी जनतेचा अपमान आहे. स्वातंत्र्याचा लढ्याचा इतिहास यांना मोडून काढायचा आहे. गांधी व आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाच्या नात्यांची मोडतोड करून सांगण्याचा उद्योग सुरू आहे. महाविकास आघाडीला सोडून गेलेल्या आंबेडकरवादी मित्रांना बाबासाहेबांचे तत्वज्ञान धोक्यात आहे हे लक्षात कसे येत नाही? यावेळी मोदींनी पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे. शहीद झालेल्या सैनिकांची सर्वाधिक संख्या नरेंद्र मोदींच्या काळातील आहे म्हणून लोकशाहीची स्वच्छता करणे आवश्यक असे प्रतिपादन ॲड.असिम सरोदे यांनी केले.
आर.बी.आय नुसार मोदीं सरकारने कॉर्पोरेट समूहाला २५ लाख कोटींची कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांना मात्र कर्ज माफी दिली नाही. ग्रामीण भागातील लोक प्रश्नांवर मतदान करतात. शेतकरी सजग झाले असून यावेळी भाजप २०० च्या पुढे जाणार नाही असे ठामपणे यावेळी चौधरी यांनी सांगितले. सुप्रसिद्ध वक्ते ॲड.असिम सरोदे यांनी यावेळी सांगितले की “देशात यापूर्वीही लोकप्रतिनिधी पळवले गेले , फोडले गेले मात्र महाराष्ट्रात यावेळी आमदार खासदार यांचेसह पक्ष व चिन्हच पळविण्याचा प्रकार घडविण्यात आला तो महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही. महात्मा गांधींच्या पाया पडून त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या नथुराम गोडसेच्या संस्कृतीचे असलेले मोदी देखील संसदेच्या पायरीवर डोके ठेवून पाया पडीत संविधानाच्या चिंधड्या उडवत आहेत. अदाणीला काश्मिरमध्ये जगातील ७ व्या लिथेनियमचा साठा असलेली जमिन घेता यावी म्हणून मोदींनी कलम ३७० पूर्णपणे रद्द केलेले नसून त्यातील केवळ जमिन खरेदीबाबतचे कलम रद्द केले आहे.