करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- किल्ला विभाग येथील अशोक (इसाक) रमजान पठाण यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. पठाण यांची अंत्ययात्रा सकाळी ९:३० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
इसाक पठाण हे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नेतृत्व म्हणून परिचित होते. पठाण यांनी आज पर्यंत अनेक गोर गरिबांना बहुजन विकास संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या योजना मोफतपणे मिळवून दिलेल्या होत्या. त्यांचे कार्याचा गुणगौरव करीत शिवसेनेने त्यांना किल्ला रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच त्यांच्या कार्याने विविध कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पठाण यांच्या अशा आकाली जाण्याने अनेक स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.