सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम डोंगरांवर वन अतिक्रमणासाठी वनव्यांचा रात्रीस खेळ चाले.
बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) जंगलातील वनव्याच्या रात्रीस खेळ चाले,महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशात वनसंपत्ती राहील तर देश वाचेल या हेतूने शासनाकडून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक खर्च व प्रयत्न केले जातात. वनांच्या संरक्षणासाठी राज्यातील वन विभाग सक्रिय असतो,मात्र गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सलईपाडा,धाबादेवी,गुऱ्हाडपाणी तसेच बोरपाणी येथील जंगलात तसेच गावांना लागून असलेल्या दुर्गम पहाड पट्टयातील तसेच डोंगररांगांतील भागात वणवा लागलेला असून वनविभागाचे याकडे लक्ष नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तसेच पेसा कायद्यानुसार स्थानिकांना प्राधान्य देऊन वन विभागात नियुक्त्या होऊनही वन विभागाचे स्थानिक वन रक्षक तसेच कर्मचारी हे नागरिकांना वनांचे महत्व समजावून सांगण्यात अपयशी ठरत आहेत.अश्यातच हा वणवा मानवनिर्मित असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे असून यामागे वन अतिक्रमनाचा गैर प्रकार चालू असल्याबाबत परिसरातील नागरिक सांगत आहे.
सातपुड्याच्या पर्वत रांगेतील शिखर असलेल्या डोंगररांगा गेल्या दोन ते तीन आठवड्यात 4 ते 5 वेळा वणवा पेटतांना दिसत आहेत.अश्यातच रात्रीच्या वेळी 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरून आगीचे लोट स्पष्टपणे दिसत आहेत यावरूनच कळते की,आगीचे स्वरूप किती मोठे असेल तसेच बोराडी किंवा परिसरातील गावाच्या कोणत्याही भागातून हा वणवा आपल्याला दिसू शकतो. त्यामुळे त्या वणवण्याची भीषणता कळते.मात्र या आगीत यात मोर,ससा,मुंगूस यांसारखे वन्यजीव,प्राणी तसेच अनेक पक्षी त्यांची घरटी पूर्णपणे नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमीनी व्यक्त केली आहे.मात्र वनविभाग या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे,आम्ही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहोत असे जरी अधिकारी सांगतांना दिसत असले तरी गेल्या दोन आठवड्यात ही तिसऱ्यांदा आग लागून वणवा पेटला आहे अश्यातच आगीवर नियंत्रण का मिळवले जात नाही,असा सवाल आता पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत.
गेल्या 20 ते 25 दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे वणव्याचा रोद्र प्रकार सर्वांच्या समोर आला होता.त्या वेळी त्यानंतर काही काळ या वणवा थांबल्याचे दिसून आले,मात्र आता पुन्हा वणव्याचे प्रकार सुरू झाल्याने हे वणवे मानवनिर्मितच असून नैसर्गिक नसल्याबत नागरिकांचे म्हणणे आहे. वन अतिक्रमण करून शेती करण्यासाठी,कोळशासाठी तसेच वन्यजीवांची शिकार करण्यासाठी अशा प्रकारे आग लावली जाते असे बोलले जाते.मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाकडे प्रभावी यंत्रणा नसल्याचे यातून सिद्ध होते.तरी पुन्हा पुन्हा सांगूनही या गोष्टींकडे वन विभागाने लक्ष दिले नसल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहे.