पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे होताहेत हाल..
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे भर उन्हाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसात नागरिकांचे होताहेत पाण्यासाठी हाल.. गेल्या काही दिवसात झामी चौक परिसरातील पाण्याचे टाकी चे डायव्हर्ट करण्याचे काम सुरू होते, तेव्हा आणि आता टाकी पाडल्यानंतर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे या ठिकाणची पाईपलाईन फुटल्यामुळे यां टाकीवरून पाणीपुरवठा होत असलेल्या परिसरात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असुन एकीकडे सकाळी सकाळी भोंगा वाजून पाणीपट्टी नळपट्टी भरा नाहीतर दोन टक्के व्याज आकारले जाईल. असे म्हणणारे अमळनेर न.पा. चे प्रशासकीय अधिकारी संदीप गायकवाड पाण्यासाठी वन वन मरणाऱ्या जनतेचे भर उन्हाळ्यात हाल पाहत आहेत की काय असे जनसामान्यातून बोलले जात आहे.
कोणत्या नियोजनाच्या आधारे झामी चौक टाकी पाडली,?
तर एक-दोन दिवस आगोदर या परिसरात पाणी का सोडले गेले नाही किंवा तसे नियोजन करून त्या परिसरात गाडी का फिरवली गेली नाही. हेच पालिकेचे ढीसाळ नियोजन समजावे का..?? पुढील दोन-तीन दिवसात पाणीपुरवठा पूर्वनियोजित सुरू न झाल्यास पालिकेवर हंडा मोर्चा काढू असेही नागरिकांनी यावेळी बोलून दाखवले..
गोपी कासार यांच्या प्रयत्नातून परिसरातील नागरिकांची भागते तहान..
याच परिसरातील सामाजिक जाण असलेले माजी नगरसेवक गोपी कासार यांच्या प्रयत्नातून रोज दहा ते बारा टँकर पाणी पुरवून लोकांची भागतेय तहान.. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या परिसरात नळाला पाणी येत नसल्याने परिसरातील नागरिकात असंतोष निर्माण झाला आहे.