ग्रामविकास विभाग नाडेप टाकीची विल्हेवाट लावणार कशी…?
रजत डेकाटे -प्रतिनिधी नागपूर ✍️
नारायणराव दामोधरराव पांढरीपांडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या नाडेप टाकी कुजणाऱ्या जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा एक उत्तम नमुना आहे.ज्यामध्ये विटा आणि सिमेंट पासून जोडणी करून त्यांच्या तळभागाला ठेचून मजबूत करुन योग्य अंतरावर टाकीच्या बांधकाम भिंतींना छिद्र ठेवण्यात येते.त्या छिद्राद्वारे टाकी मध्ये हवा खेळती राहत असते.अश्याप्रकारे निर्माण केलेल्या टाकीमध्ये पाला -पाचोळा त्याचप्रमाणे सेंद्रिय पदार्थ,तणे,धस्कटे, पिकांचे औषध गावातील जैविक कचरा,माती,शेण,काला या संयुगाचा वापर करून कंपोस्ट खत तयार केले जाते.
त्यामध्ये टाकीच्या खालच्या स्तराला जैविक घटक आच्छादन केले जाते.त्यावर शेणामातीचे आच्छादन केले जाते.अश्याचप्रकारे थरावरथर रचून टाकी जैविक कचऱ्याने पुर्ण भरण्यात येते व उंच वाट्याच्या स्वरूपात शेणामातीचे आच्छादन केले जाते.काही कालावधीनंतर शेणामातीचे उंचवटे समतोल झाल्यावर आणि आणि आतमध्ये सेंद्रिय कंपोस्ट खत निर्मिती झाल्याचे दिसून येत असते.व उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत त्यापासून मिळत असते.
परंतु वास्तविक पाहता ग्रामीण भागामध्ये शासनाकडून राबवली जात असून योग्य मार्गदर्शनाच्या आभावाखाली अजैविक घटक व घनकचरा वाटेल त्या प्रमाणात टाकत असताना दिसत आहे.यावेळी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तथा सरपंच अज्ञानपावतांना दिसून येत आहे.