अमळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या तीपोलीस कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी तडका फडकी बदली..
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर पोलिस ठाण्यांत तीन पोलिसांची तडकाफडकी बदली झाल्याने एकच खळबळ उडाली यात पोलिस हेडकॉन्स्टेबल शरद तुकाराम पाटील, पोलिस नाईक दीपक शांताराम माळी,
रवींद्र अभिमन पाटील यांचा समावेश आहे.
तिघेही पोलीस कर्मचाऱ्यांचा अमळनेर शहरासह तालुक्यात चांगला तगडा जन संपर्क होता अमळनेर शहरातील प्रत्येक पोलीस चौकीचा देखील चांगला ग्राउंड अभ्यास होता.
पण काही दिवसापूर्वी अमळनेर शहरात झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे माजी नगरसेवक पुत्राच्या मृत्यूच्या प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीतून या तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रारी झाल्याची चर्चा आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री उशिरा बदलीचे आदेश काढले. तर शरद पाटील (भडगाव), दीपक माळी (बोदवड), रवींद्र पाटील (अडावद) अशी पोलीस कर्मचाऱ्या ची बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांविषयी वाढलेल्या तक्रारी, आपापसातील चढाओढीची माहिती पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत डॉ माहेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने ह्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अमळनेर येथील माजी नगरसेवक पुत्राच्या मृत्यूनंतर दाखल आकस्मिक मृत्यू प्रकरणाच्या
चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाने
(सीआयडी) ने वरील तीन जणांना बोलाविले होते. त्यानुसार त्यांची चौकशी झाली.
काय होते प्रकरण..
अमळनेरला लहान मुलांच्या किरकोळ भांडणाचे रूपांतर दोन गटांमधील तुफान दगडफेकीत झाले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या धरपकडीत अशफाक सलीम शेख (वय ३३, रा. दर्गा मोहल्ला, अमळनेर) याला ताब्यात घेतले होते. तो माजी नगरसेवक सलीम शेख यांचा मुलगा असून, त्याला पोलिस कोठडी दिल्यावर कोठडीत त्याची प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.