चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व मराठी विभाग आयोजित दूरदृश्य प्रणालीद्वारे कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. एस. डी. महाजन यांनी भूषविले.प्रमुख मार्गदर्शक मा. प्रा. डॉ. योगिता पाटील, झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, धुळे,मा. प्रा. डॉ. माधवराव कदम,ग.तु. पाटील महाविद्यालय नंदुरबार तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.जी.डी. देशमुख, उपप्राचार्या प्रा. डॉ. उज्ज्वल आर. मगर, प्रा. के. पी. रामेश्वरकर, प्रा. डॉ. उज्वला पं. नन्नवरे, प्रा. पूजा भि.महाले, प्रा. डॉ. आर. पी. निकम, प्रा.संदीप ना. पाटील, प्राध्यापक बंधू-भगिनी व विद्यार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मा. प्रा. डॉ. योगिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कुटुंबातील पालक-पाल्य-शिक्षक व विद्यार्थी अशा विविध स्तरावरील संवाद हरवत चालला आहे. पूर्वी कुटुंबात संवाद होत होते म्हणून कुटुंबात वातावरण आनंदी राहत होते. आता मात्र वेगळी परिस्थिती दिसून येते. म्हणून कथाकथन कार्यक्रमातून संवाद सुरू झाले. ब्रँडेड वस्तू किंवा चविष्ट पदार्थ, दागिन्यांची भूक असणार्या वर्तमानात संवादाची भूक जी आहे ती प्रथम स्थानी आहे. ती जर भागवली गेली नाही तर मानसिक सुख-समाधान आपण वस्तूच शोधत राहू.आपण वस्तू वर प्रेम करणारे व्यक्ती बनत तर नाही ना अशी शंका यायला लागली आहे. त्यासाठी कथाकथन सारख्या कार्यक्रमातून मूल्यसंवर्धन नक्कीच होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच आज आपण हजारो किलोमीटर दूर जरी रहात असलो तरी आपण संवादी असणे आणि मनानेही जवळ असले पाहिजे. संवादातून प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हायला हवा. ऑफलाइन कार्यक्रमातून प्राध्यापक बंधू-भगिनी विद्यार्थी-विद्यार्थिनी- पालक एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण होते, संवाद होतो पण तसे कोरोनामुळे होत नाही. “बचेंगे तो और भी लढेंगे”,” सर सलामत तो पगडी पचास” महामारीच्या साथीतून आपण सुखरूप राहिलो तर प्रत्यक्षात नक्कीच एकमेकांशी संवाद साधू असे मतही व्यक्त केले.मा.प्रा.डॉ. योगिता पाटील मॅडम यांनी सुप्रसिद्ध कथाकार व. पु. काळे यांची “हेअर स्टाईल”ही विनोदी कथा उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. कथेतून त्यांनी वसंतराव आणि त्यांची पत्नी ह्या व्यक्तिरेखांची कुटुंबातील राग आणि अनुरागाचे संवाद हे हेअर स्टाईल वरून सुरू होतात आणि हेअर स्टाईल वरूनच संपतात प्रत्यक्षात ही कथा-घटना आपल्यासमोर साक्षात घडते आहे असे सुंदर वातावरण निर्मिती करीत विनोदी,शांत आणि प्रवाही भाषाशैलीतून कथा कथन केले. दुसरे प्रमुख कथाकार मा. प्रा.डॉ.माधवराव कदम,ग.तू. पाटील महाविद्यालय नंदुरबार यांनी “श्यामची आई”या विषयावर कथाकथन केले. मा.प्रा.डॉ. माधवराव कदम यांनी आपापसातील संवाद संपत असल्याबद्यल खंत व्यक्त केली.”आऊटडेटेड झाले आयुष्य, स्वप्ने डाऊनलोड होत नाहीसंवेदनाना व्हायरस लागला, दु:खही सेंड करता येत नाहीजुने पावसाळे उडून गेले, डिलीट झालेल्या फाईलीसारखे आणि घर शांत असते,मोबाईला रेंज नसल्यासारखे” मा.प्रा.डॉ. माधवराव कदम पुढे म्हणाले मानवी संवाद संपत चालले आहेत.म्हणून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने वेगवेगळ्या महाविद्यालयात वेगवेगळ्या विषयांवर उपक्रमातून संवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संवाद घडवून आणण्याच्या प्रकियेत नानासाहेब य.ना.चव्हाण महाविद्यालय देखील पुढे आहे. मा.प्रा.डॉ. माधवराव कदम यांनी “श्यामची आई”या विषयावर सुंदर पध्दतीने एकपात्री प्रयोग आणि निवेदन शैलीतून कथेचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले व आई आणि मुलाचे नाते, शिस्त, परिस्थितीची जाणीव व संस्कारमूल्यांची शिकवण दिली. कथाकथन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे उपप्राचार्य,डॉ. एस.डी.महाजन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कथाकथन आ.प्रा.डॉ.योगिता पाटील मॅडम यांनी अतिशय नाजुक अशा विषयावर व. पु. काळे यांची “हेअर स्टाईल “ही कथा सादर केली. पाककला, दागदागिने, साडी, सौंदर्यप्रसाधने, रांगोळी, गायन ,हेअर स्टाईल वगैरे हे महिलांचे अतिशय जिव्हाळ्याचे विषय. हेअर स्टाईल हा सामान्य विषय परंतु मॅडम यांनी कसदार, मधुर आवाजातून लाघवी, ओघवत्या,श्रवणसुलभ शैलीतून वातावरण निर्मितीतून कथा सादर करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मा.प्रा.डॉ. माधवराव कदम यांनी “श्यामची आई” या संस्कार कथेचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. कथाकथन म्हणजे नाविन्यपूर्ण अशा एकपात्री प्रयोगाच्या आणि निवेदनाद्वारे श्यामच्या जीवनातील, बालपणीचा प्रसंग श्याम आणि त्याची आई,मित्र या व्यक्तीरेखा साक्षात उभ्या केल्या.आई आणि मुलाचे नाते किती नाजूक असते हा संस्कार आजच्या युवा वर्गाला नक्कीच संस्कारीत करेल. उत्कृष्ट कथाकथनकार कसा असावा, त्याच्या आवाजातील चढउतार, भाषा सादरीकरण, कथेचा प्रारंभ, मध्य, शेवट या कथाकथनाच्या सूत्रांचाही परिचय सर्वांना झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी मार्गदर्शन केले. तर उपप्राचार्य,समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष प्रा.डॉ.जी.डी.देशमुख, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.डी.महाजन, उपप्राचार्या प्रा.डॉ.उज्वल आर. मगर,प्रा.के.पी. रामेश्वरकर, प्रा.डॉ. उज्वला पं.नन्नवरे,प्रा.पुजा महाले, प्रा.डॉ.आर.पी.निकम, प्रा.संदीप ना. पाटील, प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनीपरिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. डॉ. उज्वला पं. नन्नवरे यांनी केले.अतिथि स्वागत व परिचय प्रा.के. पी. रामेश्वरकर तर आभार उपप्राचार्या प्रा. डॉ. उज्वल मगर यांनी व्यक्त केले.