June 30, 2025 10:19 am

तुकाई उपसा सिंचन प्रलंबित ठेवणाऱ्या दोषीवर कारवाई आदेश.

अपनी भाषा में पढ़े! Translate

तुकाई उपसा सिंचन प्रलंबित ठेवणाऱ्या दोषीवर कारवाई आदेश.
-जलसंधारण मंत्री. संजय जी राठोड

तुकाई उपसा सिंचन बैठकीत आमदार श्री राम शिंदेचा रुद्रावतार आवतरला..

मार्च २०२४ पर्यत योजना पूर्ण करण्याचे निर्देश_
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत:तुकाई उपसा सिंचन योजना भाजप सरकारच्या काळात मंजूर करून, सर्व परवानग्या मिळालेल्या असताना मात्र मविआ सरकारच्या काळात जाणीव पूर्वक फक्त भूसंपादन झाले नाही म्हणत योजना प्रलंबित ठेवली गेली आणि संबंधित लाभधारक शेतकरी हा पाण्यावाचून वंचित ठेवला गेला. लाभार्थी शेतकऱ्यावर हा अन्याय आहे . याची जबाबदारी निश्चित करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करून आमदार प्रा श्री राम शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले … अशी माहिती बैठकीला उपस्थित असलेले भाजप कर्जत तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी दिली …. याबाबतचे सविस्तर वृत्त असे ..
आज दि.१०/१०/२०२३ रोजी तुकाई उपसा जलसिंचन योजने संबंधातील तांत्रिक प्रश्न दूर करण्या संदर्भात आ. श्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यां समवेत मृद व जल संधारण मंत्री संजयजी राठोड यांनी बैठक आयोजित केली होती ….
बैठकीच्या सुरुवातीलाच अधिकाऱ्यानी वनविभागाच्या सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत फक्त उदभवाचे भूसंपादन राहिले आहे असे म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला पण आमदार प्रा श्री राम शिंदेसाहेब यांनी संबंधित भूसंपादन चार वर्षे का झाले नाही? असे विचारले असता संबंधित शेतकरी सरळ खरेदीने भूसंपादन देण्यास संमत होते परंतु नंतर त्याने नकार दिला असे अधिकारी यांनी सांगताच आमदार प्रा राम शिंदे साहेब यांनी ” हे तुम्हाला समजायला चार वर्षे लागली का? तुम्ही सरकार म्हणून संपादन का केले नाही? सदरहू भूसंपादनाचा मोबदला सुद्धा योजनेच्या किमतीत समाविष्ट आहे असे असताना तुम्ही चार वर्ष जाणीवपूर्वक ही योजना प्रलंबित ठेऊन दुष्काळी, अवर्षण प्रवण भागातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले . हा अक्षम्य गुन्हा आहे . कोणाच्या तरी श्रेयवादाच्या लढाईत तुम्ही दुष्काळी शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय केला आहे असे म्हणत दोषींवर जबाबदारी निश्चित करत कारवाई करावी तसेच भूसंपादनाचे पैसे शिल्लक आहेत तर तत्काळ त्यासंबंधी कारवाई करुन भुसंपादन करावे व मार्च २०२४ अखेर योजना पूर्ण करावी अशी मागणी केली . त्यांच्या मागणीला दुजोरा देत मंत्री महोदय श्री संजयजी राठोड यांनी दोषीवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश देत मार्च २०२४ पर्यत तुकाई उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याचे आदेश दिले . .
संबंधित भूसंपादन करावयाच्या शेतकऱ्याचे सरकार विरोधात वकिलपत्रच तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी आंदोलन करण्याचे नाटक करणाऱ्या पुढाऱ्यांनी घेतले आहे अशीही रंजक माहिती पुढे येत आहे . श्रेयवादाचे राजकारण यामध्ये हि अवर्षण प्रवण भागाला दिलासा देणारी योजना प्रलंबित ठेवण्याचे पाप मागिल ४ वर्षापासून सत्ताधारी मविआ सरकारने आणि प्रतिनिधींनी केले आहे अशी घणाघाती टिका भाजप तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे यांनी केली आहे .
या बैठकीसाठी भाजप कर्जत तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे तसेच श्री नंदराम नवले (संचालक कृ . उ बा समिती कर्जत ) श्री गणेश पालवे (जिल्हाधक्ष भाजप भ .वि . आघाडी )श्री संपतराव बावडकर, श्री दत्ता मुळे, श्री गणेश काळदाते, श्री नितीन खेतमाळस ( सरपंच, मिरजगाव ) श्री डॉ रामदास सुर्यवंशी, श्री अमृत लिंगडे,श्री नंदलाल काळदाते, आदी प्रतिनिधी उपस्थित होते .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!